AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोक कोंबडीवाला म्हणून उल्लेख करतात, नारायण राणे असं का म्हणाले?

माजी मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे. गेली कित्येक दिवस ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा पक्षबदल केला. मात्र अजूनही त्यांचे राजकीय महत्त्व कमी झालेले नाही.

लोक कोंबडीवाला म्हणून उल्लेख करतात, नारायण राणे असं का म्हणाले?
narayan rane
| Updated on: Apr 27, 2025 | 5:23 PM
Share

Narayan Rane : माजी मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे. गेली कित्येक दिवस ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा पक्षबदल केला. मात्र अजूनही त्यांचे राजकीय महत्त्व कमी झालेले नाही. कोकणात तर त्यांची वेगळी ताकत आहे. दरम्यान याच नारायण राणे यांनी भ्रष्टाचार करण्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा, असं विधान केलंय. तसेच आपल्या व्यवसायाचं उदाहरण देताना त्यांनी काहीजण आम्हाला कोंबडीवाला म्हणतात असंही सांगितलंय.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

“मी 1982 सालापासून मुंबईत चिकनचा व्यवसाय करतोय. हा व्यवसाय आता भाऊ करतो. आम्ही फक्त गल्ल्यावर बसतो. कापणारे वेगळे असतात. काही लोक कोंबडीवाला म्हणून आमचा उल्लेख करतात,” असं नारायण राणे यांनी सांगितलं.

औषधावर 15 टक्के पैसे खाण्यापेक्षा…

तसेच, “भ्रष्टाचार करण्यापेक्षा कोणताही व्यवसाय केलेला बरा. करोना महासाथीच्या काळात औषधावर 15 टक्के पैसे खाण्यापेक्षा हा व्यवसाय बरा आहे. कोण पैसे खातायत हे तुम्हाला माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येण्याने…

पुढे बोलताना त्यांनी मनसेचे राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली आहे. “दोन भाऊ आम्हाला एकत्र नको आहेत का? त्यांनी एकत्र यावं. संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येण्याने काय होणार आहे. आज त्यांच्याकडे काय आहे?” अशी जोरदार टोलेबाजी नारायण राणे यांनी केली. त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) फक्त 20 आमदार आहेत. पुढच्यावेळी पाचही आमदार नसतील, असा हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.

वैभव नाईकांच्या शिंदे गटातील प्रवेशावर राणे काय म्हणाले?

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक हे शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत हे सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. नारायण राणे यांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे. “उदय सामंत हे माझे सल्लागार नाहीत. हे माझं उत्तर आहे. मी परवानगी दिल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वैभव नाईक मला घ्या म्हणत बाहेर बसलेले असायचे. समोरून ते निष्ठावान शिवसैनिक असा बोर्ड लावतात. मला राजकारणात 59 वर्षे झालीत. वैभव नाईक हे माझ्याबद्दल काहीही बोलतात. त्यांची माझ्याबद्दल बोलण्याची लायकी नाही. मी त्यांच्याबद्दल अजूनही वाईट विचार केलेला नाही,” असं स्पष्ट मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.