AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे स्थगिती सरकार, ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठी हे सर्व सुरु; राणेंचा प्रहार

भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारला स्थगिती सरकार हे नाव दिलं आहे (Narayan Rane on Uddhav Thackeray and his government).

हे स्थगिती सरकार,  ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठी हे सर्व सुरु; राणेंचा प्रहार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 08, 2019 | 3:04 PM
Share

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारला स्थगिती सरकार हे नाव दिलं आहे (Narayan Rane on Uddhav Thackeray and his government). ठाकरे सरकार विकास करण्यासाठी अस्तित्वात आलं नसून काम बंद करण्यासाठी आलं आहे. काम बंद करुन ठेकेदाराला बोलवायचं आणि पैसे उकळायचे असंच सर्व सुरु असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला. ते कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते (Narayan Rane on Uddhav Thackeray and his government).

नारायण राणे म्हणाले, “28 नोव्हेंबरला शपथविधी झाला. आज 8 डिसेंबर आहे. तरीही अजून यांचं खातेवाटप होऊ शकलेलं नाही. खातेवाटपच काय पण अजून मंत्रीही ठरलेले नाहीत. सध्या तीन पक्षांचे मिळून सरकार आलं आहे. त्यांना मी स्थगिती सरकार नावं ठेवलं आहे. या सरकारने मागील 10 दिवसात केवळ मेट्रो आणि त्यासारख्या अन्य विकास कामांना स्थगिती देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सध्या विकास कामं बंद पडली आहेत, ठप्प आहेत. हे सरकार विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी अस्तित्वात आलेलं नाही. कामं बंद करायची, ठेकेदाराला बोलावून घ्यायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनेच हे सर्व चाललं आहे. हे सरकार दीर्घ काळ चालणार नाही. हे काही महिन्याचं पाहुणं सरकार आहे.”

कोकणात अद्याप या सरकारचं अस्तित्वही कुठं दिसत नाही. कोकणातील विकासकामे ठप्प झाली आहेत. याला पूर्णपणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष जबाबदार आहेत, असाही आरोप राणेंनी केला.

नारायण राणे म्हणाले, “सध्या यांचा एक खासदार कोकणात बैठका घेत आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यात शिवसेना नाही. असं असतानाही शिवसेनेचा खासदार सिंधुदुर्गमध्ये शासकीय बैठका कसा घेतो? अधिकाऱ्यांना सुचना कशा करतो? हे जनतेसाठी, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी नाही, तर फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे विकासावर परिणाम होणार आहे.”

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथील खासदाराने आढावा बैठका घेतल्या. खासदार अशा आढावा बैठका कुठल्या अधिकारात घेतो. केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यात शिवसेना नाही. सत्तारुढ पक्षाचा खासदार नसताना शासकीय अधिकाऱ्यांना आदेश कसे देऊ शकतो? विमानतळ 1 तारखेला चालू होणार हे त्यांनी कोणत्या अधिकारात सांगितलं? त्यामुळे शिवसेनेकडून बेकायदेशीर बैठका घेऊन आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. ही जनतेची दिशाभूल आहे, फसवणूक आहे. येणाऱ्या 15 ऑक्टोंबर ते 18 ऑक्टोंबरला आम्ही सिुंधुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यात गावभेटी घेणार आहोत. यात हे सरकार कसं विकासाला पोषक नाही हे सांगू, असंही राणे यांनी सांगितलं.

Follow Us
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत