AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्याची हिंमत होतेच कशी?”

Chhagan Bhujbal : सावरकरांची जयंती साजरी करताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवला; छगन भुजबळ आक्रमक

सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्याची हिंमत होतेच कशी?
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: May 29, 2023 | 11:11 AM
Share

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची काल जयंती होती. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी भाजप-शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तात्पुरत्यास्वरूपात हटवण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सावरकरांच्या जयंतीला विरोध नाही. पण पुतळे हटवण्याचं काही कारण नव्हते. राजमुद्रा झाकण्याचे काम केलं गेलं. अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्याची हिंमत कशी होते?, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, असं भुजबळ म्हणालेत.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी काय सुरू होतं, हे शरद पवारसाहेबांनी दोन वाक्यात सांगितलं आहे. या धर्मकांडामध्ये मी सहभागी झालो नाही याचा मला अभिमान आहे, असं ते म्हणाले. काल जे काही झालं ते मनाला वेदना देणारं आहे. नवीन संसद झाले पाहिजे यात काही दुमत नाही. मात्र हे लोकशाहीचं मंदिर आहे. सगळ्यांना सोबत घेऊन उद्घाटन केलं असतं तर उचित ठरलं असतं, असंही भुजबळ म्हणालेत.

येत्या काळात निवडणुका लागल्यास महाविकास आघाडीची भूमिका काय असेल. तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्या निवडणुका घेतली तरी आम्ही तयार आहोत. कर्नाटकमध्ये जे पानिपत झालं आहे. त्यामुळे भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं आवश्यक आहे, असं ते म्हणालेत.

मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंदिरात ड्रेस कोड लागू करणं हा मूर्खपणा आहे. असं असेल तर मग मंदिरात बसलेल्या पुजाऱ्याने देखील अंगावर सदरा घालावा. पण ते उघडेच बसतात, असं भुजबळ म्हणाले.

जागा वाटपाच्या चर्चा थांबल्या पाहिजेत. ही जागा चर्चा काय मीडियात करण्यासारखी नाही. महाविकास आघाडीचे नेते बसून यावर निर्णय घेतील, असं म्हणत आगामी निवडणुकीतील जागा वाटपाच्या मुद्द्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर