AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीला धक्का, 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारणात अनेक भूकंप होत असल्याचे दिसत आहे. अनेक पक्षातील आमदार, खासदार, नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जवळपास 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या […]

राष्ट्रवादीला धक्का, 17 आमदार  मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
| Edited By: | Updated on: May 29, 2019 | 1:16 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारणात अनेक भूकंप होत असल्याचे दिसत आहे. अनेक पक्षातील आमदार, खासदार, नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जवळपास 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.

दरम्यान, बाहेरील आमदारांना पक्षात प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारी दिली, तर पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. यामुळे कार्यकर्त्यांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल, असं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना वाटत असल्याने थोडा वेळ थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

नुकतेच काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटीलही काँग्रेसला रामराम करत भाजपात जाण्याचा तयारीत आहेत. तर राष्ट्रवादीचे कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा दारुण पराभव झाल्यानंतर तेही आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला आहे. काँग्रेसचे नेते विखे पाटील, चार आमदार,अनेक जिल्हा परिषद सदस्य तसेच अनेक नेते भाजपच्या वाटेवर असून 1 जूनला भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. 50 नगरसेवक आणि 2 आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. तसेच अजून काही आमदार आणि नेते मंडळी लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली आहे. फोडाफोडीच्या राजकारणांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला येत्या विधानसभेतही नक्कीच फटका बसेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विधानसभा (2014) निकाल 

  • भाजप : 128
  • शिवसेना : 66
  • काँग्रेस : 42
  • राष्ट्रवादी : 41
  • इतर : 11

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.