AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीला धक्का, 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारणात अनेक भूकंप होत असल्याचे दिसत आहे. अनेक पक्षातील आमदार, खासदार, नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जवळपास 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या […]

राष्ट्रवादीला धक्का, 17 आमदार  मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 29, 2019 | 1:16 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारणात अनेक भूकंप होत असल्याचे दिसत आहे. अनेक पक्षातील आमदार, खासदार, नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जवळपास 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.

दरम्यान, बाहेरील आमदारांना पक्षात प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारी दिली, तर पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. यामुळे कार्यकर्त्यांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल, असं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना वाटत असल्याने थोडा वेळ थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

नुकतेच काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटीलही काँग्रेसला रामराम करत भाजपात जाण्याचा तयारीत आहेत. तर राष्ट्रवादीचे कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा दारुण पराभव झाल्यानंतर तेही आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला आहे. काँग्रेसचे नेते विखे पाटील, चार आमदार,अनेक जिल्हा परिषद सदस्य तसेच अनेक नेते भाजपच्या वाटेवर असून 1 जूनला भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. 50 नगरसेवक आणि 2 आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. तसेच अजून काही आमदार आणि नेते मंडळी लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली आहे. फोडाफोडीच्या राजकारणांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला येत्या विधानसभेतही नक्कीच फटका बसेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विधानसभा (2014) निकाल 

  • भाजप : 128
  • शिवसेना : 66
  • काँग्रेस : 42
  • राष्ट्रवादी : 41
  • इतर : 11

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं