AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : बंडखोरांच्या कुटुंबीयांना केंद्राची सुरक्षा द्या, नवनीत राणांची मागणी, ठाकरेंना उद्देशून केलं महत्त्वाचं विधान

नवनीत राणा म्हणाल्यात, शिवसेनेच्या 38 आमदारांची सही असलेले पत्र एकनाथ शिंदे गटामध्ये खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांसोबत काम करणारे खरे शिवसैनिक आहेत. हिंदुत्वासाठी त्यांनी कित्तेक वर्षापासून काम केलं. उद्धव ठाकरे यांच्यापासून आता ते दूर गेले आहेत.

Navneet Rana : बंडखोरांच्या कुटुंबीयांना केंद्राची सुरक्षा द्या, नवनीत राणांची मागणी, ठाकरेंना उद्देशून केलं महत्त्वाचं विधान
बंडखोरांच्या कुटुंबीयांना केंद्राची सुरक्षा द्या, नवनीत राणांची मागणी
| Updated on: Jun 25, 2022 | 1:21 PM
Share

अमरावती : राजकीय आकसापोटी शिवसेनेतील (Shiv Sena) एकनाथ शिंदे समर्थक (Eknath Shinde supporters) आमदारांची सुरक्षाव्यवस्था काढली, असा आरोप शिंदे गटानं केलाय. त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांचं म्हणणंय. आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री, शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत जबाबदार असतील, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना यासंदर्भात पत्र लिहिलंल. यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कुटुंबीयांनी नाही, असं वक्तव्य केलंय. त्यात खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली. बंडखोरांच्या कुटुंबीयांना केंद्राची सुरक्षा द्या, अशी मागणी नवनीत राणा यांनी दिली. याशिवाय ठाकरेंना उद्देशून त्यांनी काही महत्त्वाचं विधान केलंय.

शिंदे गट हीच खरी सेना

नवनीत राणा म्हणाल्यात, शिवसेनेच्या 38 आमदारांची सही असलेले पत्र एकनाथ शिंदे गटामध्ये खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांसोबत काम करणारे खरे शिवसैनिक आहेत. हिंदुत्वासाठी त्यांनी कित्तेक वर्षापासून काम केलं. उद्धव ठाकरे यांच्यापासून आता ते दूर गेले आहेत. परंतु, त्यांना बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे आहेत. एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही उद्धव ठाकरे यांचे सैनिक नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत.

संजय राऊतांच्या बोलण्याचा अर्थ काय?

उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्रात आतापर्यंत गुंड निर्माण केले आहेत. त्या गुंडांचा वापर केला जात आहे. अशीच गुंडगिरीची भाषा खासदार संजय राऊत वापरत आहेत. ते एक जबाबदार व्यक्ती आहेत. राऊत म्हणतात की, आमदारांना सुरक्षा आहे. पण, त्यांच्या कुटुंबीयांना नाही. याचा अर्थ काय असा सवाल राणा यांनी राऊत यांना विचारला. आमदारांच्या कुटुंबीयांना मारणार आहोत का, तुम्ही आमदारांना सरळ-सरळ धमकी देत आहोत. त्यांना आम्ही मारून टाकू म्हणून. आमच्यासोबत परत आले नाही तर… एवढे वरिष्ठ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत, असही नवनीत राणा यांनी स्पष्ट केलंय.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.