AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्या हाताने लिहिलं त्याच हाताला धरून उद्धव ठाकरेंना मंत्रालयात नेलं असतं तर आज ही वेळ आली नसती”

Prakash Ambedkar on Lok Majhe Sangati Book : अजित पवार बोलले ते खरं की शरद पवार सांगतायेत ते खरं?; 'या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

ज्या हाताने लिहिलं त्याच हाताला धरून उद्धव ठाकरेंना मंत्रालयात नेलं असतं तर आज ही वेळ आली नसती
| Updated on: May 02, 2023 | 3:44 PM
Share

पुणे : शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. यात 2019 नंतरचा जो कालखंड आहे. यात 2019 नंतर राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलांवर भाष्य करण्यात आलं आहे. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 25 नोव्हेंबर 2019 ला देखील एक मोठा गौप्यस्फोट याबाबतीत झाला होता, जो अजित पवारांनी केला होता. त्यांनी केलेला गुप्तस्फोट आणि आज पुस्तकातून झालेला गौप्यस्फोट हा परस्परविरोधी आहे. त्यामुळे लोकांनी ठरवावं की, काय खरं आणि काय खोटं?, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या याबद्दल मी अधिक काहीच बोलणार नाही. मला फारशी काही माहिती नाहीये. राज्यात नक्की दोन राजकीय स्फोट होतील, वाट बघत बसा, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार स्टेबल आहे. राज्यातलं सरकार अस्थिर नाही. राजकीय अस्थिरता ही राजकीय पक्षांमध्ये आणि सरकारमध्ये नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

शरद पवारांनी पुस्तक ज्या हाताने लिहिलं त्याच हाताने उद्धव ठाकरे यांना हाताला धरून मंत्रालयात नेलं असतं तर बरं झालं असतं. आज ही परिस्थिती नसती, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.

मी उद्धव ठाकरे सत्तेमध्ये असतानाच बोललो होतो की, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जायला हवं होतं. मातोश्री हे लोकांना आदरणीय आहे. पण उद्धव ठाकरेंनी सचिवालयात गेलेच पाहिजे होतं. ही माझी भूमिका होती आजही ठाम आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

शरद पवार यांचा राजीनामा

लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाश सोहळ्यात शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहेत. कुठे थांबायचं हे मला कळतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी त्यांना विनंती केली आहे. जयंत पाटील यांनीही राजीनामा मागे घेण्याती शरद पवार यांना विनंती केली. यावेळी जयंत पाटील भावूक झाले. जयंत पाटील यांच्यासोबतच जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, फौजिया खान यांच्यासह अन्य नेत्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.