AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी अमेठीतून आज अर्ज दाखल करणार

अमेठी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विविध ठिकाणचे उमेदवार विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. त्यानुसार आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेसकडून भव्य रोड शो आणि शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. अमेठीत पाचव्या टप्प्यात म्हणजेच 6 मे रोजी लोकसभा निवडणूक पार […]

राहुल गांधी अमेठीतून आज अर्ज दाखल करणार
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

अमेठी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विविध ठिकाणचे उमेदवार विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. त्यानुसार आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेसकडून भव्य रोड शो आणि शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. अमेठीत पाचव्या टप्प्यात म्हणजेच 6 मे रोजी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकांची जय्य्त तयारी सुरु आहे. विविध लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय अनेक उमेदवार प्रचारदौरा, सभांचे आयोजन करत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे देखील देशभरात प्रचारदौरे करत असून त्यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत चंद्रपूर, वर्धा, पुणे यांसारख्या विविध ठिकाणी प्रचारसभा आयोजित केल्या होत्या.

दरम्यान, आज राहुल गांधी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधी वाड्रा उपस्थित राहणार आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास हे तिघेही एका विशेष विमानाने अमेठीकडे रवाना होणार आहेत. राहुल यांचा अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेसतर्फे भव्य रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मुंशीगंज-दरपीपुरच्या रस्त्यावर राहुलच्या भव्य रोड शो आयोजित केला आहे. ‘आर्शिवाद आणि अभिनंदन यात्रा’ असे या रोड शो ला नाव देण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या या रोड शो काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधी अमेठीतून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी हा मतदारसंघ मुलगा राहुल गांधींसाठी सोडला आणि त्या रायबरेलीतून लढल्या. राहुल गांधींनी 2004, 2009 आणि 2014 ची निवडणूक अमेठीतून जिंकली. सध्या ते चौथ्यांदा या मतदारसंघातून उमेदवार आहेत. लोकसभा निवडणूक 2014 ला भाजपतर्फे स्मृती इरानी यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र स्मृती यांचा पराभव करत राहुल गांधी विजयी झाले होते. यंदाही भाजपतर्फे स्मृती इरानी यांनाच तिकीट देण्यात आले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी आणि केरळमधील वायनाड येथून निवडणुकीसाठी उभे राहणार आहे. 4 एप्रिल रोजी राहुल यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 1967 ला निर्मिती झालेला अमेठी मतदारसंघ हा नेहरु-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. 2014 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसला जिंकण्यासाठी कधीही कसरत करावी लागली नाही. 1967 च्या पहिल्या निवडणुकीत विद्याधर वाजपेयी हे काँग्रेसचे अमेठीचे पहिले खासदार ठरले. त्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. त्यानंतर या मतदारसंघातून त्यांचे चाचा संजय गांधी, राजीव गांधी यांनीही निवडणूक लढवली होती.

संबंधित बातम्या:

राहुल गांधी आज वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली