AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत जोडो यात्रा अचानक जम्मूच्या बनिहलमध्ये का थांबवली? राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसचा पवित्रा काय ? जाणून घ्या

जम्मूतील बनिहलमध्ये भारत जोडो यात्रा अचानक थांबविण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी भारत जोडो यात्रेला सुरक्षा न दिल्याने ही यात्रा थांबविल्याची माहिती समोर येत आहे.

भारत जोडो यात्रा अचानक जम्मूच्या बनिहलमध्ये का थांबवली? राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसचा पवित्रा काय ? जाणून घ्या
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Jan 27, 2023 | 2:34 PM
Share

जम्मू : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मू येथे जाऊन पोहचली आहे. बनिहलमध्ये ही यात्रा जाऊन पोहचली आहे. भारत जोडो यात्रेला सुरक्षा न मिळाल्याने ही यात्रा कॉंग्रेसच्या वतिने थांबविण्यात आली आहे. जोपर्यंत सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत यात्रा पुढे जाणार नाही असा पवित्रा कॉंग्रेसने घेतला आहे. या भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते सहभागी झाले आहे. कन्याकुमारी पासून सुरू झालेली यात्रा थेट जम्मू येथे जाऊन पोहचली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही यात्रा सुरू असून राहुल गांधी यांचा हजारो किलोमीटरचा पायी प्रवास झाला आहे. जम्मू येथे नुकतेच महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सहभागी झाले होते. जम्मू येथे जाऊन पोहचलेली भारत जोडो यात्रा सुरक्षाच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. जम्मू येथील सरकारने सुरक्षा न दिल्याने ही यात्रा खोळंबली आहे. कॉंग्रेसचे नेतेही सुरक्षेवरुन आग्रही आहेत.

कन्याकुमारी पासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा आता जम्मूत जाऊन पोहचली आहे. विविध कारणांनी भारत जोडो यात्रा चर्चेत आली आहे.

जम्मूतील बनिहलमध्ये ही यात्रा मात्र अचानक थांबविण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी भारत जोडो यात्रेला सुरक्षा न दिल्याने ही यात्रा थांबविल्याचे समोर आले आहे.

राहुल गांधी यांच्यासह या भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसचे बडे नेते सहभागी झाले असून सुरक्षा न दिल्याने कॉंग्रेसचे नेते आक्रमक झाले आहे.

जम्मू सरकारने सुरक्षा न दिल्याने कॉंग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कन्याकुमारीपासून राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रत्येक राज्यात सुरक्षा मिळाली होती. अचानक जम्मूत सुरक्षा नसल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.