AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांनी वारसदार का म्हटलं? राज ठाकरे म्हणाले…

कोणाकडे बघितले की घंटी वाजते. त्यानंतर व्यंगचित्र काढण्याची सुरुवात होते. पण राज्यातील आजची परिस्थिती पाहिली तर घंटी वाजत नाही तर घंटा वाजू लागते

बाळासाहेबांनी वारसदार का म्हटलं? राज ठाकरे म्हणाले...
नाशिकमध्ये ठाकरे गटालाच नव्हे, मनसेलाही खिंडार, अमित ठाकरे नाशकात असतानाच पक्षात फूट
| Updated on: Jan 08, 2023 | 12:23 PM
Share

पुणे : पुण्यात झालेल्या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात व्यंग, वास्तव, राजकारण या विषयांवर राज ठाकरे (raj thackeray) यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत व्यंगचित्रावर (caricature)बोलताना आजच्या राजकारणांवर राज ठाकरे यांनी बोट ठेवले. त्यांनी राजकारण्यांनी अनेक व्यंगात्मक फटकारे लागावले. त्याचबरोबर माध्यमांनाही त्यांनी चार गोष्टी सुनावल्या.

मुलाखातीच्या सुरवातीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांना “तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं?” असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनी हजर जबाबीपणाने मिश्किलपणे उत्तर दिलं. राज म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे मला त्यांचा व्यंगचित्रकार म्हणून वारसदार का म्हटले हे आता मला त्यांना विचारता येणार नाही.” या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

व्यगंचित्र कसे शिकले :  आपण व्यंगचित्र वडील आणि बाळासाहेबांकडून शिकलो. बाळासाहेबांनी जे सल्ले दिले त्यानुसार व्यंगचित्र काढत गेलो. सात ते आठ तास अभ्यास करत गेलो. बाळासाहेबांनी सांगितले होते की, जे समोर दिसेल ते काढ. त्यानंतर जे समोर दिसेल ते उतरवत गेलो. मुद्रीत माध्यमांमध्ये व्यंगचित्र प्रसिद्ध होण्याची मजा काही तरी वेगळी होती. सोशल मीडियावर ती मजा नाही.

राजकीय परिस्थितीमुळे घंटा वाजतात : राजकीय व्यंगचित्र काढताना समोर चेहरा आले की दिसावे लागते. कोणाकडे बघितले की घंटी वाजते. त्यानंतर व्यंगचित्र काढण्याची सुरुवात होते. पण राज्यातील आजची परिस्थिती पाहिली तर घंटी वाजत नाही तर घंटा वाजू लागते, अशा षटकार आजच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांनी मारला.

माध्यमांवर राजकीय चर्चा बंद करा : माध्यमांनी महत्वाचे प्रश्न सोडून फक्त राजकारणावर चर्चा होते. राजकारणावर चर्चा बंद करुन राज्यातील शेती, शेतकरी, ग्रामीण भाग आणि तळागळातील लोकांचे प्रश्न मांडायला हवे. पण राऊत काय बोलला आणि पवार काय बोलले, याच बातम्या दिल्या जातात. हे सर्व बंद करायला हवे. ही कोणती पत्रकारिता आहे आपणास कळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काय म्हणाले…:  देशातील एखाद्या राज्याला महत्व दिले जात आहे. हे सर्वात आधी मी म्हटले होते. त्यांनी देशाचा विचार करायला हवे. परंतु फक्त गुजरातचा विचार केला जातो. हा प्रश्न सर्वात आधी मी मांडला. त्यानंतर त्यावर शहामृगसारखे झाले.

चांगले ते चांगले : जे चांगले आहे. त्याचे कौतूक करतो. मोदी यांनी राम मंदिराचा प्रश्न सोडवलाय. त्यांनी काश्मीरचा प्रश्न सोडवला. त्यामुळे त्याचे कौतूक केले. परंतु जेथे चुकत आहे, तेथे स्पष्ट विरोध केलाय. मी जे चांगले आहे त्याला चांगले म्हणणार आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणाणार आहे. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. राजकारण परिवर्तनशील आहे, हे समजले पाहिजे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.