मनसे अ‍ॅक्शन मोडमध्ये, ग्रामपंचायत निवडणुकांवर बैठक, इंजिन पुन्हा रुळावर येणार?

| Updated on: Jan 15, 2021 | 8:12 PM

ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे

मनसे अ‍ॅक्शन मोडमध्ये, ग्रामपंचायत निवडणुकांवर बैठक, इंजिन पुन्हा रुळावर येणार?
Raj Thackeray
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपला अडचणीत आणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरेंचा पक्ष हा फक्त मुंबई, नाशिक, ठाणे पुण्यासारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. पण, यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे (MNS) पहिल्यांदाच गावपातळीच्या राजकारणात आपली ताकद आजमावत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने मनसेनी यासंदर्भात खलबतं करण्यासाठी बैठक बोलावली आहे. (Raj Thackeray MNS meeting for Gram Panchayat Election)

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज ठाकरेंच्या ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष वेगाने तयारीला लागले आहेत.

राज ठाकरे मेळावा घेणार

पुणे जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मनसेच्या पॅनेलतर्फे उमेदवार मैदानात असतील. त्यातच राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तालुकास्तरावर बैठका, मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत. तर राज ठाकरे 23 तारखेनंतर स्वत: पुणे जिल्ह्यात मेळावा घेणार आहेत.

रिव्हर्स मोडवरील मनसेचे इंजिन रुळावर येणार?

मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सुरु झाल्यात. सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसेचे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळवलाय.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात निवडणुकीचं महत्व वेगळं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपची ताकद गाव पातळीवर आहे. ग्रामीण भागात मनसेचे काम, मनसेचे संघटन उभ करण्याची संधी आहे. यानिमित्ताने मनसेला ग्रामीण भागातील पाया भक्कम करता येऊ शकतो, राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मनसेने शड्डू ठोकला, 4134 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार

भाजपच्या गडात मनसेची ताकद, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसैनिक आक्रमक

(Raj Thackeray MNS meeting for Gram Panchayat Election)