AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | लोकांना आमच्याकडून अपेक्षा, मात्र मतदान आम्हाला नाही : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS anniversary) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14 व्या वर्धापन दिनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं.

Raj Thackeray | लोकांना आमच्याकडून अपेक्षा, मात्र मतदान आम्हाला नाही : राज ठाकरे
| Updated on: Mar 09, 2020 | 1:47 PM
Share

मंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS anniversary) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14 व्या वर्धापन दिनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मनसेची वाटचाल आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. या वर्धापन दिन सोहळ्यात मनसेने शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. प्रत्येक खात्यावर मनसेचा एक नेता त्याच्या टीमसह लक्ष ठेवणार आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “शॅडो कॅबिनेट अर्थात प्रति मंत्रिमंडळात एवढी नावं टाकण्याले कोणालाही वाटू नये मी मंत्री झालो. सर्वांना सांगितलं आहे हट्ट धरू न का की पैश्याचं खातं मिळालं नाही. चुकीची गोष्ट झाली तर वाभाडे काढा, पण सरकार चांगलं वागलं तर चांगलं म्हणा” (Raj Thackeray speech MNS anniversary)

14 वर्ष कशी गेली हे सर्वांना माहीत आहे. 13 आमदार निवडून आले होते मग पुढे काय झालं हे प्रश्न आम्हलाच फक्त का विचारता? ज्यांनी जास्त वर्ष राज्य केले त्या काँग्रेसची दिल्लीत कशी अवस्था झाली हे कळलं.

दिल्लीत 70 पैकी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही, 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं, त्याची चर्चा नाही, आम्हालाच प्रश्न 13 आमदार निवडून आले होते काय झालं? लाटा येतात जातात, असं राज ठाकरे म्हणाले.

देशात 60-70 वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसची बिकट परिस्थिती, दिल्ली निवडणुकीत एकही आमदार निवडून आलेला नाही, मग तुमचे 13 आमदार निवडून आले होते? हा प्रश्न आम्हालाच का विचारता, भाजपलाही अनेक राज्यात हादरे बसले, असं राज ठाकरेंनी नमूद केलं.

देशात अशा लाटा येत असतात.  यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला अनेक सल्लागार असतात. सर्व चढउतार होत असताना तुम्ही सर्वजण मनसेच्या मागे उभे राहिलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. अनेकांना प्रश्न पडतात की राज ठाकरे सोबत एवढी माणसं कुठून येतात? असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करू, असं राज ठाकरे शॅडो कॅबिनेटबाबत म्हणाले.

गेल्या 14 वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन,  असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

चढ उतार पाहत असताना तुम्ही माझ्याबरोबर राहिलात त्याबाबत धन्यवाद. अनेकांना याचंच आश्चर्य वाटतं. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानतंर एवढी माणसं येतात कुठून लोकांना रिझर्ल्टपण दिले. सत्तेवर बसलेल्यांकडून अपेक्षा नाहीत आणि माझ्याकडून अपेक्षा. पण मी अशा अपेक्षांचं करु काय? जे विषय आहेत ते 25 मार्चला शिवतीर्थावर मांडेन. जनतेला सांगू इच्छितो की सरकारवर अंकुश असावा म्हणून हे शॅडो कॅबिनेट आहे. मला सांगितल्याशिवाय पुढे जायचं नाही. पत्रकार परिषद मला सांगितल्याशिवय घ्यायची नाही. ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाही, असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.