AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो पाण्यातूनही तेल काढतो, निधी नसतानाही काम करतो, ते नाव आहे नितीन गडकरी : राजनाथ सिंह

लखनौ : लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यातच लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजप नेते मोठ्या प्रमाणात सभा आणि विकासकामांचे लोकार्पण करत आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राउंडवर डझनभर विकासकामांचा शुभारंभ झाला. राज्यातच नाही तर संपूर्ण देशात भाजप हिच ट्रिक वापरतो आहे. त्यातच देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि […]

जो पाण्यातूनही तेल काढतो, निधी नसतानाही काम करतो, ते नाव आहे नितीन गडकरी : राजनाथ सिंह
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

लखनौ : लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यातच लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजप नेते मोठ्या प्रमाणात सभा आणि विकासकामांचे लोकार्पण करत आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राउंडवर डझनभर विकासकामांचा शुभारंभ झाला. राज्यातच नाही तर संपूर्ण देशात भाजप हिच ट्रिक वापरतो आहे. त्यातच देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लखनौमध्ये उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये रस्त्यांचा शुभारंभ केला. यावेळी राजनाथ सिंह यांनी गडकरींवर कौतुकाचा वर्षाव केला. “या विकास कामांचं संपूर्ण श्रेय हे नितीन गडकरी यांचं आहे. गडकरींकडे दूरदृष्टी आहे. ते जे म्हणतात ते करुन दाखवतात. जे पाण्यातूनही तेल काढतात, ते नितीन गडकरी आहेत. जे निधी नसतानाही काम करतात, ते नितीन गडकरी आहेत”, असे म्हणत राजनाथ सिंह यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. यावेळी या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.

“मी अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना लखनौला एक जागतिक दर्जाचे शहर बनवायचे होते. 2014ला जेव्हा मी इथे निवडणुकीपूर्वी आलो होतो, तेव्हा मी कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं. पण सरकार येताच 100 दिवसांत मास्टर प्लॅन तयार केला आणि त्यावर काम केले. त्यामुळे आता आपले लखनौ हे ‘Luck Now’ बनलं आहे”, असेही राजनाथ म्हणाले.

तर गडकरी म्हणाले की मी पूर्वीही लखनौला आलो होतो. मात्र, आजचं लखनौ हे बदललं आहे. तसेच गडकरींनी नागपूरचे उदाहरण देत म्हटले की, “आमच्याकडे सांडपाण्यापासून बायो सीएनजी तयार केली जाते. आता लवकरच हे उत्तर प्रदेशातही सुरु करु, यामुळे जल आणि वायू प्रदुषणापासून मुक्तता मिळेल.”

दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासूनचं नागपूरकरांचं मेट्रोचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय. नागपूरकरांचं आकर्षण असलेल्या नागपूर मेट्रोला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवत सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. नागपूर मेट्रो ही देशातील ग्रीन मेट्रो आहे. या मेट्रोसाठी सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. स्टेशन सुद्धा ग्रीन आणि ऐतिहासिक आहेत. कमी खर्च आणि कमी वेळात बनलेली ही मेट्रो आहे. नागपुरात वर मेट्रो आणि खाली उड्डाण पूल, त्या खाली रोड अशी व्यवस्था असलेली देशातील कदाचित पहिलीच सेवा  असावी, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

Follow Us
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार