AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam : शरद पवार, अजित पवारांनी डाव साधला, दोघांनी शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा आरोप

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच रामदास कदम यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी संवाद साधला.

Ramdas Kadam : शरद पवार, अजित पवारांनी डाव साधला, दोघांनी शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा आरोप
रामदास कदमImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2022 | 11:50 AM
Share

मुंबई : रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी डाव साधला. संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. अजित पवार  यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे. सेना कोसळताना पहावत नाही. आज माझे वय सत्तर वर्ष आहे. गेली 52 वर्ष मी शिवसेनेसाठी काम करत आहे हे सांगताना त्यांना आश्रू अनावर झाले.

‘या वयात आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं’

पुढे बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं आहे की, माझ वय आज सत्तर वर्ष आहे. मी गेली 52 वर्ष शिवसेनेसाठी काम करत आहे. शिवसेना वाढवण्यासाठी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन प्रकरणात माझ्यावर अनेक गुन्हे आहेत. मात्र तरी देखील आदित्य ठाकरे माझ्या कॅबीनमध्ये येऊन मला बैठका घेण्याचे आदेश देतात. या वयात आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावे लागते, याची खंत वाटत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. मात्र मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणल्याशिवाय शांत बसणार नाही, अखेरपर्यंत माझ्या हातात भगवाच असेल असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

‘उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही’

शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडली. आम्ही सांगत होतो मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकले नाही. पवारांनी बरोबर डाव साधून शिवसेना फोडली असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच शिवसेनेतून आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान दुसरीकडे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत. आमदारानंतर आता खासदारांनी देखील बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.  या खासदारांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.