AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानावर रणजीत सावरकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले….

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे...

सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानावर रणजीत सावरकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले....
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 20, 2022 | 3:05 PM
Share

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi Statement) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर असं विधान कुणी केला असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्याबद्दलचा खुलासा सुद्धा भविष्यात येईल, असं मला वाटतं, असं रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जी पत्र लिहिली होती, तो त्यांच्या रणनीतीचा भाग होता. ते त्यांनी सिद्धही केलं होतं. त्यामुळे अशी विधानं करणं चूक आहे, असंही रणजीत सावरकर म्हणाले आहेत.

सुधांशू त्रिवेदी यांचं विधान काय?

“औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली”, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सुधांशू त्रिवेदी यांचं हे जुनं विधान आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय.

त्रिवेदी यांच्या या विधानाचा सगळेच निषेध करत आहेत. आता कॉग्रेसही निषेध करत आहे.काँग्रेस शिवरायांना राज्यपुरूष मानतंय याचा मला आनंद आहे, असंही रणजीत सावरकर म्हणालेत.

भाजपने हा अपमान केलाय, असं मला वाटतं नाही. भाजपचा कार्यकर्ता शिवाजी महाराजांचा अपमान करणार नाही. सुधांशू यांचं वक्तव्य चुकीचं आहे. महाराजांची काही पत्र आहेत. पण ती स्टॅटर्जीचा भाग आहेत, असं रणजीत म्हणालेत.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान