AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेची आचारसंहिता 13 तारखेला लागणार : रावसाहेब दानवे

येत्या 13 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जालन्यात ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात जाहीर करुन टाकलं

विधानसभेची आचारसंहिता 13 तारखेला लागणार : रावसाहेब दानवे
| Updated on: Sep 01, 2019 | 5:17 PM
Share

जालना : विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक कधी जाहीर होणार, याचा अंदाज बांधण्यात भाजप नेत्यांची चढाओढ लागलेली दिसत आहे. येत्या 13 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता (Assembly Election Code of Conduct) लागणार आहे, असं भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जाहीर करुन टाकलं. जालन्यात ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात संवाद साधताना दानवेंनी ही माहिती दिली.

येत्या 13 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, असं दानवे म्हणाले. बारा दिवस बाकी आहेत. तोपर्यंत आमची यात्रा (महाजनादेश यात्रा) चालणार आहे. यात्रा एकदा संपू द्या, तुमच्या मागण्या एकदा कागदावर आणा. जालन्यात बैठक घ्या, आम्हाला बोलवा आणि मागण्या समजावून सांगा. नाराज होऊ नका, असं दानवे कार्यकर्त्यांना म्हणाले. राजकारणातही मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अनंतचतुर्दशी 12 सप्टेंबरला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 12 तारखेला आचारसंहिता लागणार असून 15 ऑक्टोबरला मतदान असेल, असं दोनच दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

मुख्यमंत्रिपदाबाबत पुढच्या काळात विचार करु

‘मुख्यमंत्री व्हा मुख्यमंत्री’ अशी मागणी जालन्यात आयोजित सभेच्या वेळी एका कार्यकर्त्याने दानवेंकडे केली. ही मागणी ऐकताच रावसाहेब दानवेंची कळी खुलली आणि ‘हे बघा… याला म्हणतात माणूस, एक समर्थक निघाला आपला’ अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली. ‘अरे मुख्यमंत्री आपलाच आहे ना. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आपलेच होते’ अशी पुष्टीही दानवेंनी जोडली.

‘तुम्ही व्हा तुम्ही’ असा गलका कार्यकर्त्यांनी केला. त्यातच ‘जालन्याचा पाहिजे’ अशी मागणी कोणीतरी केली. त्यावर मुख्यमंत्रिपदाबाबत पुढच्या काळात विचार करु, अशी सावध प्रतिक्रिया दानवेंनी दिली. आपले मुख्यमंत्री सक्षम आहेत, असंही रावसाहेब दानवे पुढे म्हणाले.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....