
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम आत्तापासून वाजू लागले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याचे हेडक्वार्टर म्हणून रत्नागिरी नगरपरिषदेची ओळख आहे.

याच नगरपरिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे धरतीवरती शिवसेना बॅनर बाजी सुरू झालीय. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरीचा मतदारसंघ. याच मतदारसंघातील रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक उदय समंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

त्याचमुळे सध्या उदय सामंत यांनी शहरात केलेल्या विकास कामांचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रत्येक वाॅर्डच्या तोंडावर हे बॅनर्स पहायला मिळतायत.

एकीकडे शहरातील खड्ड्यांमुळे, विविध ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त असताना अशा बॅनर मुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.