AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तालिबानी वृत्तीने वागाल तर शेतकरी शांत बसणार नाही, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारला इशारा

बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून राज्य सरकारमधील नेते आणि प्रशासन कामाला लागलंय. अशावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. शेतकरी आपले बैल आणून न्याय मागणार असतील आणि हे तालिबानी वृत्तीने वागत असतील तर शेतकरी शांत बसणार नाही, तो आंदोलन करेल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय.

तालिबानी वृत्तीने वागाल तर शेतकरी शांत बसणार नाही, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारला इशारा
सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
| Edited By: sagar joshi | Updated on: Aug 18, 2021 | 3:21 PM
Share

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. मात्र, त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ही बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून राज्य सरकारमधील नेते आणि प्रशासन कामाला लागलंय. अशावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. शेतकरी आपले बैल आणून न्याय मागणार असतील आणि हे तालिबानी वृत्तीने वागत असतील तर शेतकरी शांत बसणार नाही, तो आंदोलन करेल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय. (Sadabhau Khot criticizes Mahavikas Aghadi government)

20 ऑगस्ट रोजी गोपीचंद पडळकर यांनी झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंचक्रोशीतील गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. झरे गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. असं असलं तरी 20 ऑगस्टला सरकारनं कितीही ताकद लावली तरी शेतकरी येतील. जे काही अनुचित होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल. आम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मैदानात उतरु, संघर्ष करु, असा पवित्रा आता सदाभाऊ खोत यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

‘..तर खिलारी बैल नामशेष होतील’

बैलगाडा शर्यतीची परंपरा 400 वर्षे जुनी आहे. याबाबत 2014 मध्ये सुप्रीम कोर्टानं बंदी आणली. त्यांनी सांगितलं की राज्यांनी कायदा करावा. राज्य सरकारने 2017 ला याला परवानगी देण्याचा कायदा झाला. त्याचा अहवाल आला. कर्नाटक, तामिळनाडू सरकारने कायदा करुन शर्यती सुरु केल्या. महाविकास आघाडी सरकारकडून न्यायालयात बाजू मांडली गेली नाही. महाराष्ट्रात देशी गायींचं संगोपन धोक्यात आलं आहे. खिलारी जात ही धावण्यासाठी असते. शर्यत बंद राहिली तर बैलांची ही जात नामशेष होईल, असं मतही खोत यांनी यावेळी व्यक्त केलं.

आटपाडी तालुक्यातील 9 गावांमध्ये संचारबंदी

आटपाडी तालुक्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून 20 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ही संचारबंदी लागू असणार आहे.

आमदार गोपीचंद पडळकर कोर्टाची बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत नियमबाह्य शर्यतीचे आयोजक, संयोजक, स्पर्धक, बघ्यांवरही गुन्हे दाखल करणार, असे स्पष्ट करत कोणत्याही स्थितीत बैलगाडी शर्यती होवू देणार नाही, असा पवित्रा पोलीस व महसूल प्रशसानाने घेतलाय. प्रांताधिकारी संतोष भोर, डीवायएसपी अश्विनी शेंडगे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी झरे येथील बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगाने बैठक घेत त्या टाळण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनाही बैठकीला निमंत्रीत करण्यात आले होते. आमदार पडळकरांचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते.

बैलगाडा शर्यत टाळण्यासाठी पोलिसांकडून धरपकड

सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड सुरु करण्यात आलीय. तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सगळ्या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. इतकंच नाही तर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांना पोलीस विभागाकडून नोटीसा देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

बैलगाडा शर्यत आयोजित करणे अंगलट, अहमदनगरमध्ये 47 जणांवर गुन्हा, 6 जण ताब्यात

बंदी असताना बैलगाडा शर्यतीचं आयोजन, गोपीचंद पडळकरांकडून बक्षिसांची खैरात, ठाकरे सरकार कारवाई करणार ?

Sadabhau Khot criticizes Mahavikas Aghadi government

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?