AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझ्या दादाहो-ताईहो, मला तुम्हाला विचारायचंय…”, सुषमा अंधारेंची नक्कल कुणी अन् का केली?

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आलीये. पाहा...

माझ्या दादाहो-ताईहो, मला तुम्हाला विचारायचंय..., सुषमा अंधारेंची नक्कल कुणी अन् का केली?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 08, 2023 | 8:20 AM
Share

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली आहे. त्यांची मिमिक्री करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सुषमा अंधारेंच्या स्वरात “माझ्या दादाहो-ताईहो, मला तुम्हाला विचारायचंय…” , हे वाक्य म्हटलं अन् उपस्थितांनी त्याला दाद दिली.

माझ्या दादाहो-ताईहो, आम्हाला तुम्हाला विचारायचंय… आम्ही भरत असलेल्या टॅक्सचा आम्हाला काय मोबदला मिळाला? ताईहो… तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आणखी कुणावर केली पण आमचं काय?”, असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय.

25 वर्षे शिवसेना महापालिकेत सत्तेत होती. या 25 वर्षात अनधिकृत बांधकामं झाली. रस्ते झाले नाहीत. पावसाळ्यात थोडा पाऊस झाला की मुंबईची तुंबई होते. मग आम्हा सर्वसामान्य लोकांना काय दिलंत?, असाही सवाल संदीप देशपांडेनी केला आहे.

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. अशात मनसेही आक्रमकपद्धतीने मैदानात उतरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी सुषमा अंधारे अन् आदित्य ठाकरेंवर घणाघात केलाय.

आदित्य ठाकरेंची मिमिक्री

अरे बाबा मुंबई महापालिकेत सत्तेत होतात तुम्ही, आमच्या रस्त्यांचं काय? ‘नाही, आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी’, असं म्हणताना देशपांडेंनी आदित्य ठाकरेंच्या आवाज काढला. आम्ही प्रश्न विचारतो, आमचे हॉस्पिटल कधी चांगले होणार? ‘नाही ते, 50 खोके घेतले त्यांनी’, असं म्हणत संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली.

ठाकरेगटाला सवाल

त्यांनी खंजीर खुपसलं. मग तुम्ही पाठ का उघडी ठेवली? अरे पण या सगळ्याशी आम्हाला काय देणं घेणं? तुम्ही आमच्या प्रश्नांवर बोला. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. त्यांच्या समस्यांचं काय त्या कधी सोडवणार? असं म्हणत संदीप देशपांडेंनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आहे.

मुंबई महापालिकेने 2 कोटी रूपये टॅक्सच्या रुपाने मुंबईकरांकडून जमा केले त्या बदल्यात नागरिकांना कुठल्या सोयी-सुविधा दिल्या ते जास्त महत्वाचं आहे, असंही देशपांडे म्हणालेत.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय