AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते गावा-गावात फिरतायत, माणसं विकत घेतायत,प्रत्येकाचा वेगळा भाव!! संजय राऊत नवा आरोप काय?

मला अटक होणार होती, हा देवेंद्र फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशात यायचं होतं. पण त्या वेळचे मुख्यमंत्री सभ्य, सुसंस्कृत होते, असं संजय राऊत यांनी सुनावलंय.

ते गावा-गावात फिरतायत, माणसं विकत घेतायत,प्रत्येकाचा वेगळा भाव!! संजय राऊत नवा आरोप काय?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 15, 2023 | 11:09 AM
Share

मुंबईः राज्यातल्या प्रत्येक गावा-गावात सत्ताधाऱ्यांनी नेमलेले लोक फिरत आहेत. ते सर्वत्र फिरून माणसं विकत घेत आहेत. ग्रामसेवक, ग्रामपंचायतीतील पदाधिकारी, इतर पक्षांचे कार्यकर्ते, आमदार, खासदार… या सगळ्यांचं रेट कार्ड (Rate card) ठरलं आहे. त्यानुसार माणसं विकत घेतली जात आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. भाजप (BJP) आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राऊथ यांनी आज हा मुद्दा उपस्थित केला. पैशांचं अमिष दाखवून राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक विकत घेतले जात आहेत, असा त्यांचा आरोप आहे.

काय म्हणाले राऊत?

महाराष्ट्राच्या राजकारणात पैशाचा एवढा बेफाम वापर कधीही कुणीच पाहिला नाही. ग्रामसेवक, पदाधिकारी, आमदार, खासदार, या पदांचं एक रेटकार्ड लावलंय. कमिशन एजंट नेमले आहेत. हे गावा-गावात फिरतायत. माणसं विकत घेतायत. सत्तेतल्या भागीदारांची ही परिस्थिती आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय.

अमित शाह यांना ठणकावलं…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर येत आहेत. पुण्यातील कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी भाजपची ही रणनीती आहे. मात्र संजय राऊत यांनी यावरून अमित शाह यांना सुनावलंय. ते म्हणाले, ‘ अमित शाह कुठेही गेले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभणार नाहीत. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तुम्ही शेवटपर्यंत अभय दिलंत. त्यांचं समर्थन केलंत, इतकच नव्हे तर जाता जाता त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला…

शिवाजी महाराज यांना मानणारा समाज त्यांना पाठिंबा देईल, असा त्यांचा गैरसमज असेल तर त्यांनी जरूर यावं. शिवनेरीवर तुम्ही जरूर जा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या देशाला दिशा दिली, तो ज्या मातीत जन्मला, त्या मातीतून पवित्र गोष्टी घेऊन जाता आल्या तर जा, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.

‘फडणवीस यांचा हा कांगावा’

मला अटक होणार होती, हा देवेंद्र फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशात यायचं होतं. पण त्या वेळचे मुख्यमंत्री सभ्य, सुसंस्कृत होते, असं संजय राऊत यांनी सुनावलंय. आमच्यावर खोटे खटले दाखल केलेत, धाडी घालत आहात. तेव्हा तुम्हाला प्रश्न पडत नाहीत का.. सहकाऱ्यांना असा त्रास देतात आणि तुमच्या पक्षातल्या लोकांना क्लिन चीट देतात. आमचे फोन टॅप करणाऱ्यांचे गुन्हे मागे घेता. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...