AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातल्या सरकारचा मृत्यू ठरलेला, कुठलाही अडथळा आणला नाही तर सरकार फेब्रुवारी पाहणार नाही, राऊत यांचा दावा काय ?

महाशक्ती आमच्या पाठीमागे आहे असे सांगून ते सरकार चालवत असतील तर आमचा विश्वास न्याय शक्तीवर आहे असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

राज्यातल्या सरकारचा मृत्यू ठरलेला, कुठलाही अडथळा आणला नाही तर सरकार फेब्रुवारी पाहणार नाही, राऊत यांचा दावा काय ?
Image Credit source: Google
| Updated on: Jan 10, 2023 | 12:09 PM
Share

नवी दिल्ली : आम्ही सर्व प्रकारह्या लढाईला तयार आहे. गेल्या सहा महिन्यापासून राज्यात घटनाबाह्य सरकार आले आहे. जे सरकार भष्टाचार करत आहे, जे निर्णय घेत आहे ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाही. भविष्यात आपण कोणते आदर्श निर्माण करणार आहोत, महाराष्ट्रातील या प्रकरणावरुन देशात आणि जगात काय मेसेज जाणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले आहे, या देशात लोकशाही न्याय व्यवस्था आहे की नाही महाराष्ट्राबाबत जो निकाल लागेल त्यावरून स्पष्ट होईल. आमची बाजू सत्याची आहे, आम्हाला सत्याच्या पलीकडे काहीही नको आहे. सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आले, पैशाचा वारेमाफ वापर झाला, पक्षात फुट पाडली आणि खोकेबाज सरकार आले. आम्ही पहिल्या दिवसापासून न्यायालयात लढाई लढत आहोत, निवडणूक आयोगाकडे न्याय मागत आहोत, आणि यामध्ये आमच्याच बाजूने निकाल लागेल असे संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

महाशक्ती आमच्या पाठीमागे आहे असे सांगून ते सरकार चालवत असतील तर आमचा विश्वास न्याय शक्तीवर आहे असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

खरं म्हणजे हा निकाल पहिल्याच दिवशी लागू शकला असता. फेब्रुवारीपर्यन्त याबाबत निकाल लागायला पाहिजे, त्यानुसार हे घटनाबाह्य सरकार तेव्हा कोसळेल असा दावा राऊत यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमधील एक शहाणे मंत्री म्हणाले, मार्च पर्यन्त सरकार पाडून दाखवा, कानामधील बोळे काढून जरा नीट ऐका कान साफ करून माझं बोलणं ऐका असं सुधीर मुंगनटीवार यांना सुनावलं आहे.

अती शहाणे मंत्री म्हणत सुधीर मुंगणटीवर यांना टोला लावत कान साफ करून माझं वक्तव्य ऐका, नाहीतर कानकोरणे पाठवतो, जर न्यायालयीन प्रक्रिया झाली तर सरकार पडेल असे मी म्हणालो असे राऊत यांनी म्हंटलं आहे.

या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे, कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे, हे सरकार जीवंत नाही असा हल्लाबोल ही राऊत यांनी केला आहे.

जानेवारी पर्यन्त सगळी प्रक्रिया झाली तर सरकार फेब्रुवारीत पडेल असे सांगत स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगावर विश्वास असायला पाहिजे.

निवडणूक आयोगात आज सुनावणी आहे, ज्यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल अशी खात्री असल्याचेही राऊत यांनी म्हंटले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.