AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातल्या सरकारचा मृत्यू ठरलेला, कुठलाही अडथळा आणला नाही तर सरकार फेब्रुवारी पाहणार नाही, राऊत यांचा दावा काय ?

महाशक्ती आमच्या पाठीमागे आहे असे सांगून ते सरकार चालवत असतील तर आमचा विश्वास न्याय शक्तीवर आहे असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

राज्यातल्या सरकारचा मृत्यू ठरलेला, कुठलाही अडथळा आणला नाही तर सरकार फेब्रुवारी पाहणार नाही, राऊत यांचा दावा काय ?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Jan 10, 2023 | 12:09 PM
Share

नवी दिल्ली : आम्ही सर्व प्रकारह्या लढाईला तयार आहे. गेल्या सहा महिन्यापासून राज्यात घटनाबाह्य सरकार आले आहे. जे सरकार भष्टाचार करत आहे, जे निर्णय घेत आहे ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाही. भविष्यात आपण कोणते आदर्श निर्माण करणार आहोत, महाराष्ट्रातील या प्रकरणावरुन देशात आणि जगात काय मेसेज जाणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले आहे, या देशात लोकशाही न्याय व्यवस्था आहे की नाही महाराष्ट्राबाबत जो निकाल लागेल त्यावरून स्पष्ट होईल. आमची बाजू सत्याची आहे, आम्हाला सत्याच्या पलीकडे काहीही नको आहे. सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आले, पैशाचा वारेमाफ वापर झाला, पक्षात फुट पाडली आणि खोकेबाज सरकार आले. आम्ही पहिल्या दिवसापासून न्यायालयात लढाई लढत आहोत, निवडणूक आयोगाकडे न्याय मागत आहोत, आणि यामध्ये आमच्याच बाजूने निकाल लागेल असे संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

महाशक्ती आमच्या पाठीमागे आहे असे सांगून ते सरकार चालवत असतील तर आमचा विश्वास न्याय शक्तीवर आहे असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

खरं म्हणजे हा निकाल पहिल्याच दिवशी लागू शकला असता. फेब्रुवारीपर्यन्त याबाबत निकाल लागायला पाहिजे, त्यानुसार हे घटनाबाह्य सरकार तेव्हा कोसळेल असा दावा राऊत यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमधील एक शहाणे मंत्री म्हणाले, मार्च पर्यन्त सरकार पाडून दाखवा, कानामधील बोळे काढून जरा नीट ऐका कान साफ करून माझं बोलणं ऐका असं सुधीर मुंगनटीवार यांना सुनावलं आहे.

अती शहाणे मंत्री म्हणत सुधीर मुंगणटीवर यांना टोला लावत कान साफ करून माझं वक्तव्य ऐका, नाहीतर कानकोरणे पाठवतो, जर न्यायालयीन प्रक्रिया झाली तर सरकार पडेल असे मी म्हणालो असे राऊत यांनी म्हंटलं आहे.

या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे, कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे, हे सरकार जीवंत नाही असा हल्लाबोल ही राऊत यांनी केला आहे.

जानेवारी पर्यन्त सगळी प्रक्रिया झाली तर सरकार फेब्रुवारीत पडेल असे सांगत स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगावर विश्वास असायला पाहिजे.

निवडणूक आयोगात आज सुनावणी आहे, ज्यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल अशी खात्री असल्याचेही राऊत यांनी म्हंटले आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?