राज्यातल्या सरकारचा मृत्यू ठरलेला, कुठलाही अडथळा आणला नाही तर सरकार फेब्रुवारी पाहणार नाही, राऊत यांचा दावा काय ?

महाशक्ती आमच्या पाठीमागे आहे असे सांगून ते सरकार चालवत असतील तर आमचा विश्वास न्याय शक्तीवर आहे असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

राज्यातल्या सरकारचा मृत्यू ठरलेला, कुठलाही अडथळा आणला नाही तर सरकार फेब्रुवारी पाहणार नाही, राऊत यांचा दावा काय ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 12:09 PM

नवी दिल्ली : आम्ही सर्व प्रकारह्या लढाईला तयार आहे. गेल्या सहा महिन्यापासून राज्यात घटनाबाह्य सरकार आले आहे. जे सरकार भष्टाचार करत आहे, जे निर्णय घेत आहे ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाही. भविष्यात आपण कोणते आदर्श निर्माण करणार आहोत, महाराष्ट्रातील या प्रकरणावरुन देशात आणि जगात काय मेसेज जाणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले आहे, या देशात लोकशाही न्याय व्यवस्था आहे की नाही महाराष्ट्राबाबत जो निकाल लागेल त्यावरून स्पष्ट होईल. आमची बाजू सत्याची आहे, आम्हाला सत्याच्या पलीकडे काहीही नको आहे. सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आले, पैशाचा वारेमाफ वापर झाला, पक्षात फुट पाडली आणि खोकेबाज सरकार आले. आम्ही पहिल्या दिवसापासून न्यायालयात लढाई लढत आहोत, निवडणूक आयोगाकडे न्याय मागत आहोत, आणि यामध्ये आमच्याच बाजूने निकाल लागेल असे संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

महाशक्ती आमच्या पाठीमागे आहे असे सांगून ते सरकार चालवत असतील तर आमचा विश्वास न्याय शक्तीवर आहे असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

खरं म्हणजे हा निकाल पहिल्याच दिवशी लागू शकला असता. फेब्रुवारीपर्यन्त याबाबत निकाल लागायला पाहिजे, त्यानुसार हे घटनाबाह्य सरकार तेव्हा कोसळेल असा दावा राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे-फडणवीस सरकारमधील एक शहाणे मंत्री म्हणाले, मार्च पर्यन्त सरकार पाडून दाखवा, कानामधील बोळे काढून जरा नीट ऐका कान साफ करून माझं बोलणं ऐका असं सुधीर मुंगनटीवार यांना सुनावलं आहे.

अती शहाणे मंत्री म्हणत सुधीर मुंगणटीवर यांना टोला लावत कान साफ करून माझं वक्तव्य ऐका, नाहीतर कानकोरणे पाठवतो, जर न्यायालयीन प्रक्रिया झाली तर सरकार पडेल असे मी म्हणालो असे राऊत यांनी म्हंटलं आहे.

या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे, कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे, हे सरकार जीवंत नाही असा हल्लाबोल ही राऊत यांनी केला आहे.

जानेवारी पर्यन्त सगळी प्रक्रिया झाली तर सरकार फेब्रुवारीत पडेल असे सांगत स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगावर विश्वास असायला पाहिजे.

निवडणूक आयोगात आज सुनावणी आहे, ज्यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल अशी खात्री असल्याचेही राऊत यांनी म्हंटले आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.