AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Political Crisis : गुजरातसोबतच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका? राऊत म्हणतात, ही भाजपची तात्पुरती तजवीज

राज्यात स्थापन झालेल्य नवीन सरकारबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. भाजपाने घेतलेला निर्णय एवढा सहजतेने नसेल, यामागे राजकारण असणार असा प्रत्येकाचा अंदाज आहे. पण भाजपाने ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. भाजपामध्ये वेगळेच काहीतरी शिजत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Maharashtra Political Crisis : गुजरातसोबतच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका? राऊत म्हणतात, ही भाजपची तात्पुरती तजवीज
खा. संजय राऊत
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 04, 2022 | 10:36 AM
Share

मुंबई :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांच्या बंडानंतर आता कुठे नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. आणखी खातेवाटप आणि बहुमत सिध्द करणे बाकी असतानाच राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील या चर्चेला उधाण आलयं. राज्यातील परस्थिती आणि त्या परस्थितीतून निर्माण झालेले सरकार हे टिकावू नसून अल्पावधीतच मध्यावधी निवडणुका लागतील असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर आता (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनीही त्यांच्या सुरात सूर आवळला आहे. शिवाय यामागेच कारणही त्यांनी स्पष्ट केलयं. आतापर्यंत राज्यातील जनतेने गेल्या 15 दिवसांमध्ये झालेले राजकीय नाट्य पाहिले आहे. आता भविष्यात मध्यावधी निवडणुका की आणखी काही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. मात्र, राज्यातील दोन नेत्यांनी केलेले हे विधान महत्वाचे मानले जात आहे.

ही तर तात्पुरती व्यवस्था

राज्यात स्थापन झालेल्य नवीन सरकारबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. भाजपाने घेतलेला निर्णय एवढा सहजतेने नसेल, यामागे राजकारण असणार असा प्रत्येकाचा अंदाज आहे. पण भाजपाने ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. भाजपामध्ये वेगळेच काहीतरी शिजत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. सध्याचे स्थापन झालेले सरकार ही तात्पुरती व्यवस्था आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका तर लागतीलच कदाचित गुजरात बरोबरच महाराष्ट्रातही निवडणुका लागतील असा माझा अभ्यास असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे भविष्यात राजकीय पटलावर आणखी नव्या अध्यायाला सुरवात होणार का हे पहावे लागणार आहे.

शिवसेना फोडायची होती म्हणून खटाटोप

राज्याच्या हितासाठी नाहीतर भाजपाच्या टार्गेटवर शिवसेना होती म्हणूनच भाजपाने ही खेळी केली आहे. भाजपाला शिवसेना फोडायची होती म्हणून हे सर्व घडवून आणले आहे. या मुद्द्यावरुनच फुटीर गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद देण्यात आल्याचे राऊत म्हणाले आहेत. केवळ हाच उद्देश भाजपाचा होता. यापलिकडे त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. पण ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. हे सरकार अधिक काळ टिकेल असे नाही आणि अनेकांना ते टिकवायचे असेही नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुंका लागतील त्या देखील लवकरच असेही राऊत म्हणाले आहेत.

भाजपाचा उद्देश साध्य

गेल्या 15 दिवासांमध्ये राज्यात ज्या घडामोडी घडल्या त्यामागे केवळ शिवसेनेचे नुकसान हाच भाजपाचा डाव होता. तो फुटीर आमदारांमुळे साध्य झाला पण हे सरकार अधिक काळ टिकेल असे नाही. शिवसेनेने अशी संकटे यापूर्वी पाहिलेली आहेत. त्यामुळे यामधूनही सावरण्यासाठी अधिकचा काळ लागणार नाही. जे झाले त्याकडे दुर्लक्ष करुन आता पक्ष संघटनेवर भर असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट