Maharashtra Political Crisis : गुजरातसोबतच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका? राऊत म्हणतात, ही भाजपची तात्पुरती तजवीज

राज्यात स्थापन झालेल्य नवीन सरकारबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. भाजपाने घेतलेला निर्णय एवढा सहजतेने नसेल, यामागे राजकारण असणार असा प्रत्येकाचा अंदाज आहे. पण भाजपाने ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. भाजपामध्ये वेगळेच काहीतरी शिजत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Maharashtra Political Crisis : गुजरातसोबतच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका? राऊत म्हणतात, ही भाजपची तात्पुरती तजवीज
खा. संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 10:36 AM

मुंबई :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांच्या बंडानंतर आता कुठे नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. आणखी खातेवाटप आणि बहुमत सिध्द करणे बाकी असतानाच राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील या चर्चेला उधाण आलयं. राज्यातील परस्थिती आणि त्या परस्थितीतून निर्माण झालेले सरकार हे टिकावू नसून अल्पावधीतच मध्यावधी निवडणुका लागतील असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर आता (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनीही त्यांच्या सुरात सूर आवळला आहे. शिवाय यामागेच कारणही त्यांनी स्पष्ट केलयं. आतापर्यंत राज्यातील जनतेने गेल्या 15 दिवसांमध्ये झालेले राजकीय नाट्य पाहिले आहे. आता भविष्यात मध्यावधी निवडणुका की आणखी काही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. मात्र, राज्यातील दोन नेत्यांनी केलेले हे विधान महत्वाचे मानले जात आहे.

ही तर तात्पुरती व्यवस्था

राज्यात स्थापन झालेल्य नवीन सरकारबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. भाजपाने घेतलेला निर्णय एवढा सहजतेने नसेल, यामागे राजकारण असणार असा प्रत्येकाचा अंदाज आहे. पण भाजपाने ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. भाजपामध्ये वेगळेच काहीतरी शिजत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. सध्याचे स्थापन झालेले सरकार ही तात्पुरती व्यवस्था आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका तर लागतीलच कदाचित गुजरात बरोबरच महाराष्ट्रातही निवडणुका लागतील असा माझा अभ्यास असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे भविष्यात राजकीय पटलावर आणखी नव्या अध्यायाला सुरवात होणार का हे पहावे लागणार आहे.

शिवसेना फोडायची होती म्हणून खटाटोप

राज्याच्या हितासाठी नाहीतर भाजपाच्या टार्गेटवर शिवसेना होती म्हणूनच भाजपाने ही खेळी केली आहे. भाजपाला शिवसेना फोडायची होती म्हणून हे सर्व घडवून आणले आहे. या मुद्द्यावरुनच फुटीर गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद देण्यात आल्याचे राऊत म्हणाले आहेत. केवळ हाच उद्देश भाजपाचा होता. यापलिकडे त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. पण ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. हे सरकार अधिक काळ टिकेल असे नाही आणि अनेकांना ते टिकवायचे असेही नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुंका लागतील त्या देखील लवकरच असेही राऊत म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

भाजपाचा उद्देश साध्य

गेल्या 15 दिवासांमध्ये राज्यात ज्या घडामोडी घडल्या त्यामागे केवळ शिवसेनेचे नुकसान हाच भाजपाचा डाव होता. तो फुटीर आमदारांमुळे साध्य झाला पण हे सरकार अधिक काळ टिकेल असे नाही. शिवसेनेने अशी संकटे यापूर्वी पाहिलेली आहेत. त्यामुळे यामधूनही सावरण्यासाठी अधिकचा काळ लागणार नाही. जे झाले त्याकडे दुर्लक्ष करुन आता पक्ष संघटनेवर भर असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.