AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेहरूंनी देशाचा विकास केला, अन्यथा भारताचा पाकिस्तान झाला असता- संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी नेहरू, सावरकर वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेहरूंनी देशाचा विकास केला, अन्यथा भारताचा पाकिस्तान झाला असता- संजय राऊत
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 19, 2022 | 12:49 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Savarkar) यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.अशात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Neharu) यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. या वादावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केलं. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा मोठा वाटा राहिलाय.त्यांनी कायम देशाच्या विकासाचा ध्यास घेतला. स्वातंत्र्यावीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. त्या दिशेला देशाला घेऊन जाण्याचं काम नेहरूंनी केलं. त्यांनी ते काम केलं नसतं तर या देशाचाही पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

सावरकर आणि नेहरू यांनी देशासाठी अमुल्य योगदान दिलं आहे. या दोघांचं कार्य मोठं आहे. पण या दोघांवर सध्या टीका होतेय. हे होता कामा नये. दोघांभोवतीचं राजकारण थांबायला पाहिजे, असं राऊत म्हणालेत.

संजय राऊतांच्या बोलण्याचा हाच सूर आजच्या सामनाच्या अग्रेलखाही पाहायला मिळाला. “गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात . यास ढोंग नाही म्हणायचे तर काय ? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही”, असं सामनात म्हणण्यात आलंय.

“राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात , पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात?, हाच संशोधनाचा विषय आहे! महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो , आदर करतो . त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो , करत राहील!”, असं म्हणत राहुल गांधींच्या विधानावरही भाष्य करण्यात आलंय.

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?