AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एवढं खोटारडं सरकार कधी पाहिलं नाही, राजकारणात इतका जळफळाट नको; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : उद्धव ठाकरे बारसूला जाणार, जनता त्यांचं स्वागत करणार आणि महाडला भव्य सभा होणार; संजय राऊतांचं वक्तव्य

एवढं खोटारडं सरकार कधी पाहिलं नाही, राजकारणात इतका जळफळाट नको; संजय राऊतांचा हल्लाबोल
| Edited By: | Updated on: May 02, 2023 | 10:55 AM
Share

मुंबई : मुंबईतील बीकेसी परिसरातील महाविकास आघाडीची काल वज्रमूठ सभा झाली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. या सभेवर शिवसेना-भाजप युतीकडून टीका करण्यात आली. त्याला खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. तसंच बारसूतील आंदोलनावरही राऊत भाष्य केलंय. उद्धव ठाकरे बारसूला जाणार असल्याचं राऊतांनी सांगितलं आणि महाडच्या सभेच्या तयारीबाबतही राऊत बोललेत.

एवढं खोटारडं सरकार याआधी कधी पाहिलं नव्हतं. सध्याचं सरकार खोटारडं आहे. राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड जळफळाट सुरू आहे. पण इतका जळफळाट चांगला नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

ठाकरे बारसूला जाणार

रिफायनही प्रकल्पाविरोधात रत्नागिरीतील बारसूमध्ये आंदोलन होत आहे. स्थानिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. तिथे स्थानिक लोकांना भेटायला उद्धव ठाकरे जाणार आहेत. “येत्या 6 तारखेला उद्धव ठाकरे बारसूला जाणार आहेत. स्थानिक लोक त्यांचं उत्साहात स्वागत करतील. महाडलाही उद्धव ठाकरे यांची विराट सभा होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे”, असं संजय राऊत म्हणालेत.

महाविकास आघाडीची सभा भव्यच!- राऊत

काल अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं की महाविकास आघाडीच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. महाविकास आघाडीवरचा विश्वास आणि नेत्यांवरील प्रेमापोटी लोक या सभेला आले होते. महाविकास आघाडीची सभा भव्यच होती. काही लोकांना ती दिसत नाही हा त्यांचा दोष आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मविआच्या कालच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद पाहता भाजप अजून दहा वर्षं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचं धाडस करेल, असं दिसत नाही. पण त्या आधीच महाराष्ट्र आणि दिल्लीत सत्तांतर नक्की आहे. भाजपचा दारूण पराभव निश्चित आहे. मुंबई शिवसेनेचीच आहे आणि राहणार, असंही संजय राऊत म्हणालेत.

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचीच विजय होणार. लोक गद्दारांच्या पाठीशी कधीही उभे राहणार नाहीत. लोकांचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत विजय निश्चित आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.