AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut ED Raid : बाळासाहेबांची शपथ घेणं चूकीचं, राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती; रामदास कदमांनी डिवचले

राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजप सोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचे रामदास कदमांनी सांगितले आहे. युती केली मात्र, ज्यावेळी निधीवाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी का यांनी आपला स्पष्टोक्तेपणा दाखवला नाही.

Sanjay Raut ED Raid : बाळासाहेबांची शपथ घेणं चूकीचं, राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती; रामदास कदमांनी डिवचले
रामदास कदमImage Credit source: tv9 marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 31, 2022 | 10:46 AM
Share

मुंबई : संजय राऊतांच्या घरी ईडीचे अधिकारी अन् बाहेर विरोधकांकडून सडकून टिका असेच चित्र निर्माण झाले आहे. जर पत्राचाळ प्रकरणात त्यांनी चुकीचे काही केले नसेल तर भिण्याचे काय कारण असं म्हणत जो तो त्यांच्या बोचरी टिका करीत आहे. संजय शिरसाट यांनी त्यांना सुनावल्यानंतर आता रामदास कदमांनीही डिवचले आहे. संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती असा टोला कदमांनी लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शरद पवार यांचाच अधिक प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी जर शरद पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते असेच कदमांना यातून सूचित करायचे होते. एकीकडे गेल्या 3 तासांपासून राऊतांची चौकशी सुरु आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून आरोपही सुरु आहेत.

संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी

राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजप सोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचे रामदास कदमांनी सांगितले आहे. युती केली मात्र, ज्यावेळी निधीवाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी का यांनी आपला स्पष्टोक्तेपणा दाखवला नाही. त्यांनी आपला स्वार्थ साधला आणि आमदारांना वाऱ्यावर सोडले. उध्दव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेतल त्यांनी ही सर्व जुळवाजुळव केल्याने महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे कदमांनी सांगितले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही आमदारांवर अन्याय

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही सर्वात कमी निधी हा सेनेच्या आमदारांनाच होता. जर शिवसेनेबद्दल एवढे प्रेम होते तर आमदारांवर अन्याय होताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका का मांडली नाही. ते शिवसेनेचे नेते असले तरी त्यांनी कायम राष्ट्रवादीचे हित जोपासण्याचा प्रयत्न केल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यानंतर कॉंग्रेसच्या आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना केवळ 17 टक्के निधी या आमदारांना हा कोणता न्याय असा सवाल त्यांनी नेतृत्वाला आणि राऊतांनाही विचारला आहे.

शिवसेनाही राऊतांनीच संपवली

गेल्या अडीच वर्षात पक्ष वाढीसाठी तर काही नाही पण पक्ष फोडण्यामध्ये राऊतांचा मोठा रोल असल्याचा आरोप कदमांनी केला आहे. राष्ट्रवादीचे संबंध जोपासण्यासाठी एवढा सर्व खटाटोप केला आणि दुसरीकडे ज्ञान पाजळत शिवसैनिकांना दूर केले. तुमच्यामुळेच शिवसेना फुटली आणि आज ही वेळ पक्षावर आली आहे. शिवाय नेतृत्वानेही त्यांचचे ऐकल्याने सध्या पक्षाची ही अवस्था झाल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.शरद पवरांना सांगून थोडीतरी शिवसेना शिल्लक ठेवा असे सांगितले असते पक्ष जीवंत राहिला असता असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?