AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की निजामशाही ? लाज वाटत नाही ? संजय राऊत संतापले

राज्यामध्ये मोगलाई चालू आहे का ? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखान, शाहिस्तेखानाचं राज्य आहे, का निजामशाही आली आहे ? असा खडा सवाल विचारत संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.

Sanjay Raut | महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की निजामशाही ? लाज वाटत नाही ? संजय राऊत संतापले
| Updated on: Jan 25, 2024 | 10:53 AM
Share

मुंबई | 25 जानेवारी 2024 : राज्यामध्ये मोगलाई चालू आहे का ? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखान, शाहिस्तेखानाचं राज्य आहे, का निजामशाही आली आहे ? असा संतप्त सवाल विचारत संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार , माजी महापौर किशोरी पेडणकेर आणि रवींद्र वायकर यांना ईडीने समन्स पाठवलंय.

त्यातच आता ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिदेषत संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. विरोधी पक्षातल्या नेत्यांना नोटीस देण्याचं भाजपाचं तंत्र आहे असाही आरोप त्यांनी केला.

आम्ही गुडघे टेकणार नाही

विरोधी पक्षातील लोकांना नोटीस देण्याचं भाजपाचं तंत्र आहे. संदीप राऊतांना दिलेल्या नोटीशीच कारण हास्यास्पद आहे. आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही, दोन-पाच लाखांसाठी, व्यवहारासाठी तुम्ही आम्हाला नोटीशी पाठवता, तुम्ही काय चिंचोके खाता ? असा सवालही त्यांनी सरकारला विचारला. तुमच्या घरातले लोक लंडनमध्ये कितीतरी दिवस, महिने राहतात. त्यासाठी पैसे कुठून आले ? लंडनमधला व्हिला, प्रवास खर्च याचे प्रायोजक कोण आहेत ? असं आम्ही विचारी शकतो. पण आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे संस्कार आहेत त्यामुळे आम्ही कुटुंबांपर्यंत जाणार नाही. आमच्यावर ते संस्कार नाहीत. तुमची लढाई आमच्याशी आहे ना तर आमच्याशी लढून दाखवा. हे नामर्द लोक आहेत. आमचं घर डरपोक लोकांचं घर नाही. शिवसेना आमच्या रक्तात आहे असं संजय राऊत म्हणाले.

या लोकांना लाज वाटली पाहिजे

या लोकांनी रोहित पवार यांना नोटी बजावली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना नोटीस बजावता. जे डरपोक होते ते तुमच्या कळपात शिरले. या लोकांना लाज वाटली पाहिजे, असे टीकास्त्र त्यांनी सोडलं. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली पोपटलालने ( किरीट सोमय्या) 38 कोटी गोळा केला. त्याची तक्रार कुठे गेली, ती विरून गेली असा आरोपही त्यांनी केला.

अजित पवारांचा घोटाळा बाहेर काढून सरकारच्या जेलमध्ये टाकलं, राऊतांचा टोला

अजित पवारांचा घोटाळा बाहेर काढून पंतप्रधान मोदींनी त्यांना सरकारच्या जेलमध्ये टाकलं असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांसह भाजपाला उपरोधिक टोला लगावला. अजित पवारांना तुरुंगात टाकलं ना. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन मांडीवर घेतलं. या मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ आणि खांद्यावर प्रफुल्ल पटेलांना बसवलं आहे. रामच तुमचा वध करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. हे लोक सांगतात की आम्ही रामाचे भक्त आहोत, रामाची पूजा करतो. रामच यांचा वध करणार आहे असंही ते म्हणाले.

 

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.