Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या भाषणातील सात महत्त्वाचे मुद्दे
आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळं आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू.
- 56 वर्षातल्या अनेक गोष्टी ताज्या आहेत. जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची स्थापना केली. त्या क्षणाचे साक्षीदार मी आहे, त्यावेळी मी सहा वर्षाचा होतो. शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडला त्याचे पाणी माझ्या अंगावर उडाले.
- सुभाष देसाईंचे नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाईं साहेबांना सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत. नव्या दमाचे रोज सैनिक येताहेत. उद्या निवडणूक आहे. एक लोकशाही प्रमाणे बडदास्त ठेवली आहे. यांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही आहे. वर्धापन दिन म्हटल्यावर शिवसैनिक पण आहेत. इतके आमदार दिसायला हवेत. रमेश गेला कट्टर कार्यकर्ता होता, असं म्हटलं जात पायलट त्याचे ट्रेनिंग, तसा एखादा कार्यकर्ता गेला तर तो मोठा फटका असतो.
- आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळं आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू, मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झालं ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचं मतं फुटलं ते सगळ आलय समोर. कितीही फाटल तरी शिवसेनेने इतिहास दाखवलेलाआहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. अनेकांनी शिवसेना मोठी केली.
- नुसत्या उध्दव ठाकरेला किंमत नाही, बाळासाहेब नाव आहे म्हणून तुमचे प्रेम आहे. माझ्यावर जबाबदारी कशी कुणी दिली या घरात जन्म होणे हे अनाकलनीय आहे. आव्हान येतात आणि जातात. आणीबाणी आली तेव्हा शिवसेनेवर संकट पण तेव्हा धाडस दाखवले हा आपला स्थायीभाव आहे. गेल्या 56 वर्षांचा अनुभव आता आपण मजबूत करूया आपला जन्म भूमिपुत्रासाठी झाला आहे. ज्या वेळेला कुणी हिंदुत्वार बोलणारे कुणी नव्हत तेव्हा शिवसेनेने ते बुलंद केले.
- अग्निपथमुळे तरुण रस्त्यावर ह्दयात राम आणि हाताला काम तेच चित्र आज देशात आहे. काम नसेल तर काही उपयोग नाही. वारकरी आपलेच. नोटाबंदी झाली तेव्हा कुणी बोलले नाही. शेतकऱ्यांनी कायद्यावर हटून बसला मग एक पाऊल मागे घ्यावे लागले. आपण का टिकलो कारण आपण जे वचन दिले ते पाळले. अचानक योजना आणायची अग्निवीर नाव द्यायचं पण शिकवणार काय? चार वर्षाने यांच्या नौकरीचा पत्ता नाही.
- शिवाजीराव देशमुखांच्या भाषणात शिवाजी महाराज, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६ व्या वर्षी, पण आता उमेदीच्या वयात त्याला काहीतरी दाखवणार नंतर फक्त 10% लोकांना घेणार. भाडोत्री सैन्य मग काढा टेंडर, तुम्ही मग सगळच वापरा आणि फेका, मग ही लोक भडकणार नाही तर काय होईल. तुम्हाला मत दिल ते नुसत मत नाही एक धोरण असायला हवे. उद्याची निवडणूकीत आमच्यात फुट पडू शकत नाही. हे उद्या देशाला दाखवायचे आहे. महाराष्ट्रात तुमचा सत्तेचा माज चालणार नाही. प्रत्येकाला पर्याय असतोच, शेराला सव्वा शेर येणार आताचे राजकारण पाव शेराचे.
- महाराष्ट्र पेटत नाही जेव्हा पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो. हिंदुस्थानावरचा हिरवा वरवंटा महाराजांनी काढला. सचिन अहिरं चांगल काम करतोय. आदिवासी हक्काचा माणूस आहे. संपर्क प्रमुख म्हणून अहिरांचे काम चांगले आहे. हे सगळे आपलेच आहेत. शिवसेनेच्या बांधणीसाठी नविन रक्त आहे. देसाई रावतेंनी सांगितले तुम्ही निर्णय घेतला ते मान्य आम्ही शिवसैनिक आहोत. म्हणूनच आपण 56 वर्षे टिकलो. शिवसेना अजून नुसते 56 नाही तर अजून खूप पुढे जाणार आहे.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update