AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा पुन्हा निशाणा

शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरूच आहे. आता आणखी एका नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे; शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा पुन्हा निशाणा
| Updated on: Oct 22, 2022 | 1:07 PM
Share

मुंबई : शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका सुरूच आहे. आतापर्यंत अनेक गंभीर आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक आरोप शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या (farmers) हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे असं चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकप्रकारचा सुस्तपणा होता अशी टीका चिमणराव पाटील यांनी केली आहे.

नेमकं चिमणराव पाटील यांनी काय म्हटलं?

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे हे शेतकरी हिताचे निर्णय घेण्यातही विलंब करायचे असे चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकारमध्ये सुस्तपणा होता. आम्ही त्यांना म्हणायचो शेतकरी हिताचे पारदर्शी निर्णय लवकरात लवकर घ्या पण ते निर्णय घेताणा मागे, पुढे पहायचे असं पाटील यांनी म्हटलं आहे.

मात्र त्यांनी यावेळी नव्या सरकारचं कौतुक केलं आहे. शिंदे सरकार आल्यापासून प्रशासनात गतिमानता आली. एकनाथ शिंदे यांनी निर्णयाला गती दिल्याचं चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यांची टीका

दुसरीकडे शिंदे गटाचे आणखी एक आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. आता उद्धव ठाकरे यांचा धाक उरला नसल्याची टीका त्यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांचा धाक असता तर चाळीस आमदार पक्ष सोडून गेलेच नसते. उद्धव ठाकरे यांचा धाक असता तर लाखो कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नसता अशी टीका  अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत.
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.