AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा पुन्हा निशाणा

शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरूच आहे. आता आणखी एका नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे; शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा पुन्हा निशाणा
| Updated on: Oct 22, 2022 | 1:07 PM
Share

मुंबई : शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका सुरूच आहे. आतापर्यंत अनेक गंभीर आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक आरोप शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या (farmers) हिताचे निर्णय घेण्यास विलंब करायचे असं चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकप्रकारचा सुस्तपणा होता अशी टीका चिमणराव पाटील यांनी केली आहे.

नेमकं चिमणराव पाटील यांनी काय म्हटलं?

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे हे शेतकरी हिताचे निर्णय घेण्यातही विलंब करायचे असे चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकारमध्ये सुस्तपणा होता. आम्ही त्यांना म्हणायचो शेतकरी हिताचे पारदर्शी निर्णय लवकरात लवकर घ्या पण ते निर्णय घेताणा मागे, पुढे पहायचे असं पाटील यांनी म्हटलं आहे.

मात्र त्यांनी यावेळी नव्या सरकारचं कौतुक केलं आहे. शिंदे सरकार आल्यापासून प्रशासनात गतिमानता आली. एकनाथ शिंदे यांनी निर्णयाला गती दिल्याचं चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यांची टीका

दुसरीकडे शिंदे गटाचे आणखी एक आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. आता उद्धव ठाकरे यांचा धाक उरला नसल्याची टीका त्यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांचा धाक असता तर चाळीस आमदार पक्ष सोडून गेलेच नसते. उद्धव ठाकरे यांचा धाक असता तर लाखो कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नसता अशी टीका  अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा