AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-भाजपला केवळ निम्म्या महाराष्ट्राचा कौल, 19 जिल्ह्यांमध्ये भोपळा

कोल्हापूर, पालघर, भंडारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतही भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

शिवसेना-भाजपला केवळ निम्म्या महाराष्ट्राचा कौल, 19 जिल्ह्यांमध्ये भोपळा
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 30, 2019 | 11:23 AM
Share

मुंबई : सत्तास्थापना, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची, उपमुख्यमंत्रिपद अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेना-भाजपमध्ये सध्या धुसफूस पाहायला मिळत आहे. मात्र गेली पाच वर्ष सत्तेची चव चाखणाऱ्या या दोन्ही पक्षांच्या बाजूने केवळ निम्म्या राज्यानेच कौल दिल्याचं निकालाच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. कारण भाजपला चार, तर शिवसेनेला 15 जिल्ह्यांमध्ये एकाही विधानसभा मतदारसंघात खातं (Shivsena BJP Vidhansabha Seats) उघडता आलेलं नाही.

कोल्हापूर, पालघर, भंडारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतही भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. भाजपवर तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच हद्दपार होण्याची नामुष्की ओढवली आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण या भाजपच्या हातात असलेल्या दोन्ही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या.

भंडाऱ्यात भाजपचे तीन आमदार होते. भाजपने तिन्ही विद्यमान आमदारांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मात्र ही खेळी भाजपच्याच अंगलट आली आहे. कारण भाजपला तिन्ही जागा गमवाव्या लागल्या आहेत. परिणय फुकेंनाही हायप्रोफाईल लढतीत काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून पराभव स्वीकारावा लागला.

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने तीन जागा टिकवल्या आहेत. मात्र माकप आणि राष्ट्रवादीने भाजपच्या दोन्ही जागा खेचून आणत पालघरातून भाजपचं संस्थान खालसा केलं आहे. रत्नागिरीत भाजपने एकही जागा लढवलेली नव्हती.

घसरण कुठे?

अमरावतीत भाजप चार जागांवरुन एकावर घसरली आहे, तर गोंदियात तीन जागांवरुन भाजपची एकावर घसरण झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या तीन जागांपैकी एक जागा भाजपच्या हातून निसटली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात भाजप चारवरुन निम्म्या जागांवर आली.

नांदेडमध्ये भाजपकडे एक जागा होती, ती वाढून दोनावर गेली आहे. मात्र विधानसभेच्या नऊ जागा असलेल्या नांदेडमध्ये भाजपचा खासदार असूनही दोन जागांवरच भाजपचा वारु अडला आहे. परभणीत भाजपने खातं उघडत एक जागा मिळवली, ती रासपमधून आलेल्या मेघना बोर्डीकरांच्या जोरावर. तर हिंगोलीतही भाजपला एकच जागा मिळाली आहे.

अहमदनगरमध्ये विखे पाटील पिता-पुत्रांनी बाराही जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला होता. मात्र राष्ट्रवादीने त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदेंना पराभवाची धूळ चारलीच, सोबत भाजपला पाच जागांवरुन तीनावर आणून ठेवलं.

आघाडीकडून मंत्रिपद भूषवलेल्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

बीड आणि सांगलीमध्येही भाजप चार जागांवरुन दोनावर आली आहे, तर लातूरमध्ये भाजपच्या वाट्याला दोनच जागा आल्या आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबादमध्ये भाजपने अनुक्रमे एक, एक आणि दोन जागा मिळवत खातं उघडलं तेही चार आयाराम आमदारांच्या बळावर.

शिवसेनेचीही दुर्दशा

राज्यात 56 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला विदर्भात मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या विदर्भातील आठ राज्यांमध्ये एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही. बुलडाण्यात दोन तर यवतमाळ-अकोल्यात सेनेचा प्रत्येकी एकच आमदार निवडून आला आहे. म्हणजेच विधानसभेच्या 62 जागा असलेल्या 11 राज्यांमध्ये सेनेचे केवळ 4 आमदार आहेत.

विदर्भातील आठ राज्यांशिवाय नंदुरबार, धुळे, जालना, अहमदनगर, पुणे, बीड, लातूर या सात, म्हणजेच एकूण 15 जिल्ह्यांत शिवसेनेला आपलं खातं उघडता आलेलं नाही. नांदेड, हिंगोली, परभणी, पालघर, सांगलीमध्ये प्रत्येकी एक, तर नाशिक-साताऱ्यामध्ये प्रत्येकी दोनच जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत.

पुण्यात शिवसेनेला 21 पैकी केवळ सहा जागाच लढवायला मिळाल्या होत्या. परंतु शिवसेनेला पुण्यात भोपळाही फोडता आलेला नाही. दोन खासदार आणि सहा आमदार असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही कशीबशी एक जागा टिकवून ठेवण्यात शिवसेनेला यश आलं आहे.

औरंगाबादमध्ये मात्र नऊपैकी सहा जागी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. मुंबई (13) आणि ठाणे (05) नंतर औरंगाबादेतच शिवसेनेने चांगली कामगिरी बजावली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि रत्नागिरीत मिळून शिवसेनेचे (Shivsena BJP Vidhansabha Seats) निम्मे आमदार आहेत.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं