AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्याच्या वर वाढवायची का? शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar : शरद पवार दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल मुंबईत महाविकास आघाडीची सभा पार पडली. काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे या सभेला उपस्थित होते. जातीय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा यावर भाष्य करण्यात आलं. आता शरद पवार यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.

Sharad Pawar : आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्याच्या वर वाढवायची का? शरद पवार म्हणाले...
Sharad pawar
| Updated on: Nov 07, 2024 | 10:03 AM
Share

“महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या प्रचाराची सुरुवात काल पासून झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्यावतीने मी स्वत: उपस्थित होतो” असं शरद पवार यांनी सांगितलं. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ‘मी दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. नागपूरला तीन सभा घेणार आहे’ असं शरद पवार यांनी सांगितलं. “मला विश्वास आहे, महाराष्ट्राच्या जनतेला बदल हवा आहे. परिवर्तन पाहिजे आहे. आत्मविश्वास वाढवायचं काम आम्हाला करावं लागेल. आम्ही सर्व सहकारी आजपासून ठिकठिकाणच्या दौऱ्यावर जाणार आहेत” असं शरद पवार म्हणाले.

‘महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?’ असं वादग्रस्त वक्तव्य काल सदाभाऊ खोत यांनी केलं. त्यावर शरद पवारांना विचारलं असता, त्यांनी बोलणं टाळलं. भाजपात ज्या नावाची मुख्यमंत्रीपदाची चर्चा होते, तो होत नाही, असं तावडे म्हणाल्याच पत्रकारांनी विचारलं. त्यावर याची अंतर्गत माहिती त्यांना अधिक आहे असं उत्तर शरद पवारांनी दिलं.

आरक्षणावर शरद पवार काय म्हणाले?

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, जातीय जनगणना होणार. आरक्षणाची मर्यादा तोडून 50 टक्क्यांच्या वर न्यायची वेळ आलीय, त्यावर शरद पवार म्हणाले की, “मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो. जातीय जगनणनेची मागणी आम्ही मागच्या तीन वर्षांपासून करत आहोत. ती झालीच पाहिजे, त्यातून वास्तव चित्र देशासमोर येईल. ते आल्यानंतरच आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी निर्णय घेता येईल”

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.