AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटाबंदीप्रमाणे आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगा लावाव्या लागतील : सोनिया गांधी

नागरिकता सुधारणा कायदा हा पक्षपाती आहे. काँग्रेसपक्ष या कायद्याचा तीव्र निषेध करतो. संविधानाची मर्यादा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस बांधिल आहे

नोटाबंदीप्रमाणे आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगा लावाव्या लागतील : सोनिया गांधी
| Updated on: Dec 20, 2019 | 8:12 PM
Share

नवी दिल्ली : “केंद्र सरकार नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीत नागरिकांचा आवाज दाबणे चुकीचं आहे. जनतेचा आवाज ऐकणे सरकारचं कर्तव्य आहे”, अशा शब्दांत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन मोदी सरकारला खडसावलं आहे (Sonia Gandhi On CAA). “भाजप सरकारची धोरणं देशविरोधी आहेत. काँग्रेस देशातील जनता आणि संविधानाच्या बाजूने आहे”, असं सोनिया गांधी म्हणाल्या (Sonia Gandhi On CAA).

“नागरिकांचं म्हणणं ऐकूण घेणं सरकारचं कर्तव्य आहे. सध्या जे घडत आहे ते लोकशाहीत स्वीकारलं जाऊ शकत नाही”, असं मत सोनिया गांधी यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर व्यक्त केलं (Sonia Gandhi On CAA).

“नागरिकता सुधारणा कायदा हा पक्षपाती आहे. काँग्रेसपक्ष या कायद्याचा तीव्र निषेध करतो. संविधानाची मर्यादा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस बांधिल आहे”, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

“नागरिकत्व सुधारणा कायदा हा भेदभाव करणारा आहे. नोटाबंदीप्रमाणे पुन्हा एकदा एक-एक व्यक्तीला स्वत:चं आणि आपल्या पूर्वजांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगेत लागावं लागेल”, असं म्हणत सोनिया गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ : मुख्यमंत्री

देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे (CAA). मात्र, या कायद्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात दिलं (CM Uddhav Thackeray on CAA).

“सर्वोच्च न्यायालयात हा कायदा योग्य की अयोग्य याबाबतचा निर्णय व्हायचा आहे. मी अनेकांशी बोलत आहे. मला भेटल्यानंतर अनेकांचे गैरसमज दूर होत आहेत. कोणत्याही समाजातील नागरिकाने भीती, गैरसमज बाळगू नये. महाराष्ट्रातील सलोखा कायम ठेवा”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.