नोटाबंदीप्रमाणे आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगा लावाव्या लागतील : सोनिया गांधी

नागरिकता सुधारणा कायदा हा पक्षपाती आहे. काँग्रेसपक्ष या कायद्याचा तीव्र निषेध करतो. संविधानाची मर्यादा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस बांधिल आहे

नोटाबंदीप्रमाणे आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगा लावाव्या लागतील : सोनिया गांधी
Follow us
| Updated on: Dec 20, 2019 | 8:12 PM

नवी दिल्ली : “केंद्र सरकार नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीत नागरिकांचा आवाज दाबणे चुकीचं आहे. जनतेचा आवाज ऐकणे सरकारचं कर्तव्य आहे”, अशा शब्दांत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन मोदी सरकारला खडसावलं आहे (Sonia Gandhi On CAA). “भाजप सरकारची धोरणं देशविरोधी आहेत. काँग्रेस देशातील जनता आणि संविधानाच्या बाजूने आहे”, असं सोनिया गांधी म्हणाल्या (Sonia Gandhi On CAA).

“नागरिकांचं म्हणणं ऐकूण घेणं सरकारचं कर्तव्य आहे. सध्या जे घडत आहे ते लोकशाहीत स्वीकारलं जाऊ शकत नाही”, असं मत सोनिया गांधी यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर व्यक्त केलं (Sonia Gandhi On CAA).

“नागरिकता सुधारणा कायदा हा पक्षपाती आहे. काँग्रेसपक्ष या कायद्याचा तीव्र निषेध करतो. संविधानाची मर्यादा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस बांधिल आहे”, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

“नागरिकत्व सुधारणा कायदा हा भेदभाव करणारा आहे. नोटाबंदीप्रमाणे पुन्हा एकदा एक-एक व्यक्तीला स्वत:चं आणि आपल्या पूर्वजांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगेत लागावं लागेल”, असं म्हणत सोनिया गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ : मुख्यमंत्री

देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे (CAA). मात्र, या कायद्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात दिलं (CM Uddhav Thackeray on CAA).

“सर्वोच्च न्यायालयात हा कायदा योग्य की अयोग्य याबाबतचा निर्णय व्हायचा आहे. मी अनेकांशी बोलत आहे. मला भेटल्यानंतर अनेकांचे गैरसमज दूर होत आहेत. कोणत्याही समाजातील नागरिकाने भीती, गैरसमज बाळगू नये. महाराष्ट्रातील सलोखा कायम ठेवा”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.