AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे, पण आम्ही आता फ्लॉवर नाही फायर होणार’, सुधीर मुनगंटीवारांनी ऐकवला पुष्पाचा डायलॉग

या रणरणत्या उन्हात सुर्याला साक्ष ठेवून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने दळभद्री सरकारला मद्य विकणा-या नेस्तनाभूत करून इथल्या जनतेला आझाद करायचं आहे.

'पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे, पण आम्ही आता फ्लॉवर नाही फायर होणार', सुधीर मुनगंटीवारांनी ऐकवला पुष्पाचा डायलॉग
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2022 | 3:08 PM
Share

मुंबई – नवाब मलिकांचा (nawab malik) राजीनामा राज्य सरकारने द्यावा, म्हणून आज भाजप (bjp)आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेऊन देखील राज्य सरकार राजीनामा घेत नसल्याने आज भाजपाकडून मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथं नवाब मलिक यांच्यामागे सत्ता उभी केली, या सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचं आहे. बेईमान आघाडीला नेस्तनाबूत करायचं आहे. युतीच्या प्रेमापोटी नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्यांना जमिनीच्या माध्यमातून पैसे वाटले आहेत अशी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केली.

ही फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक

“ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. 1993 बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय आहे. ही फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नाही फायर होणार नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला.

सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं वाटोळं झालं

राजीनामा तुमच्या बापाला द्यावा लागेल. भाजपने तुमची दाणादाण केली आहे. या नेत्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवायचं आहे, कारण सत्तेत आल्यापासून त्यांनी लोकांचं वाटोळ केलं आहे असंही मुंनगटीवार म्हणाले. तसेच त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका देखील केली. आज मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून भाजपाची लोक आली होती. आता आमच्या संघर्षाला सुरूवात झाली त्यामुळे आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा नक्की घेणार असल्याचे सुध्दा त्यांनी भाषणात सांगितले.

दळभद्री सरकारला मद्य विकणा-या नेस्तनाभूत करून इथल्या जनतेला आझाद करायचं आहे

या रणरणत्या उन्हात सुर्याला साक्ष ठेवून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने दळभद्री सरकारला मद्य विकणा-या नेस्तनाभूत करून इथल्या जनतेला आझाद करायचं आहे. दुस-या महायु्ध्दात ज्यावेळी आरडीएक्स वापर करण्यात आला त्यानंतर मुंबईत आरडीएक्सचा वापर कऱण्यात आला. हा आरडीएक्सचा वापर बॉम्बस्फोट कऱण्यासाठी वापरण्यात आला. त्यावेळी अनेकांचे बळी गेले देश हळहळला अशी आठवण देखील भाषणात सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दाऊदने फोन केला म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप

PHOTO: देशाच्या सर्वात तरुण महापौर Arya Rajendra आणि केरळचे आमदार सचिन देव यांचा साखरपुडा, अत्यंत साधा सोहळा

Russia Ukraine War Live : रशिया ट्रान्सनिस्ट्रियाकडून घेणार सैन्याची मदत

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.