AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana : पक्षामुळेच नाही, तर निवडणूक जिंकण्यासाठी लायकीही लागते, आदित्य ठाकरेंच्या टिकेला आ. संजय गायकवाडांचे उत्तर

शिवसेनेत फूट ही राज्यातील जनतेच्या दृष्टीने चांगली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. असे असतानाही ठाकरे कुटुंबियांबद्दल कोणताही आमदार हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत नाही. असे असताना मात्र, आदित्य ठाकरे हे सातत्याने आमच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे गायकवाडांनी सांगितले आहे. असेच सुरु राहिले तर मग आमच्या सहनशीलतेचा अंत होईल असेही ते म्हणाले आहेत.

Buldhana : पक्षामुळेच नाही, तर निवडणूक जिंकण्यासाठी लायकीही लागते, आदित्य ठाकरेंच्या टिकेला आ. संजय गायकवाडांचे उत्तर
आदित्य ठाकरे आणि आ. संजय गायकवाड
| Edited By: | Updated on: Aug 07, 2022 | 2:56 PM
Share

बुलढाणा : हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम ठेवण्यासाठी शिवसेनेतील आमदारांनी एक उठाव केला आहे. हिंदुत्व जोपासयाचे असते तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत बसलेच नसते. त्यांच्यासोबत बैठका आणि त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होत असतानाही घेतलेली भूमिका हिंदुत्वाची प्रतारणा करणारी नाही का? असा सवाल (MLA Sanjay Gaikwad) आ. संजय गायकवाड यांनी (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांना विचारलेला आहे. आ. आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या दरम्यान शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असून भविष्यात दंगलीही घडवल्या जातील अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. याला उत्तर देताना आ. संजय गायकवाड यांनी हिंदुत्वाची जोपासणा कोण करतंय हे सर्व (Maharashtra) महाराष्ट्राला माहिती झाले आहे. शिंदे गटच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात असल्यााचे सांगत निवडूण येण्यासाठी केवळ पक्षच महत्वाचा असे नाहीतर त्या उमेदवराचे वजनही तेवढेच महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.

निवडणुक जिंकण्यासाठी पक्षाचे योगदान कमीच

आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने आरोप होत आहे की, पक्षाचे लेबल काढून तु्म्ही निवडून येऊन दाखवा. या टीकेला आतापर्यंक कोणी उत्तर दिले नव्हते पण संजय गायकवाड यांनी मात्र, निवडणुक केवळ पक्षाच्या जीवावर होत नाहीतर स्थानिक पातळीवर उमेदवराचे वर्चस्व आणि योगदान यावरच सर्वकाही अवलंबून असते. उमेदवाराच्या निवडूण येण्यामध्ये पक्षाचे योगदान केवळ 20 टक्के असल्याचे म्हणत त्यांनी केवळ पक्षाच्या जीवावर निवडून येऊन दाखवा असे आव्हानही त्यांनी आदित्य ठाकरे यांना केले आहे.

एकीसाठी कायम प्रयत्न, पण सर्वकाही निष्फळ

शिवसेनेत फूट ही राज्यातील जनतेच्या दृष्टीने चांगली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. असे असतानाही ठाकरे कुटुंबियांबद्दल कोणताही आमदार हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत नाही. असे असताना मात्र, आदित्य ठाकरे हे सातत्याने आमच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे गायकवाडांनी सांगितले आहे. असेच सुरु राहिले तर मग आमच्या सहनशीलतेचा अंत होईल असेही ते म्हणाले आहेत. काही बोलण्यासारखे नसले की, आदित्य ठाकरे हे आमच्यावर टीका करतात. पण जनतेला माहिती आहे की, राज्याच्या हितासाठी कोण चांगल ते? असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरेंची टिका गायकवाडांना झोंबली

शिंदे गटाची स्वतंत्र स्थापना झाली असतानाही अजून या गटातील आमदार हे ठाकरे कुटुंबियांबद्दल सावध प्रतिक्रिया देतात. असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्याकडून टीकेचे बाण हे सुरुच आहेत. हिंदू मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून दंगली घडवण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप आदित्य यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत बैठका घेता मग ही काय हिंदुत्वाची प्रतारणा नाही का ? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.