Eknath Shinde : अखरे जनतेला निर्णय मान्य..! ग्रामपंचायत निकालावरुन काय म्हणाले मुख्यमंत्री..?

निकालामुळे भविष्यात काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde : अखरे जनतेला निर्णय मान्य..!  ग्रामपंचायत निकालावरुन काय म्हणाले मुख्यमंत्री..?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 6:31 PM

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे (Grampanchayat Election) निकाल समोर आले असून यामध्ये भाजप आणि शिंदे (BJP & Shinde Group) गटालाही ग्रामीण भागातील जनतेने कौल दिला आहे. युती सरकारची (Coalition government) स्थापना होऊन अडीच महिन्याचा कालावधी झालेला आहे. एवढ्या अल्पावधीत सर्वसामान्यांच्या मनाला पटेल असाच कारभार राज्यात सुरु आहे. आणि याच कामाची पावती जनतेने ग्रामपंचायतीच्या निकालावरुन दिलेली आहे. या निकालामुळे भविष्यात काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडच्या कामाच्या पाहणीसाठी आले असता त्यांनी हे सांगितले आहे.  तर हे सरकार सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात काम केले त्यापेक्षा अधिक पटीने गेल्या अडीच महिन्यात काम केल्याने हा निकाल समोर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ताब्यात अधिक ग्रामपंचायती असल्याचा दावा मविआ च्या नेत्यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीचे असे चित्र : भाजापकडे – 143, शिंदे गटाकडे- 41, शिवसेनेकडे 37, कॉंग्रेसकडे 59, राष्ट्रवादीकडे 127 तर इतर ठिकाणी 88 असे चित्र आहे.