AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी राजकीय घडामोड, उद्धव ठाकरेंचा 3 दिवस दिल्ली दौरा; इंडिया आघाडी घेणार मोठा निर्णय

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसीय दिल्ली दौरा महत्त्वाचा ठरला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत ते सहभागी होतील आणि राहुल गांधींसह इतर नेत्यांशी भेटतील.

सर्वात मोठी राजकीय घडामोड, उद्धव ठाकरेंचा 3 दिवस दिल्ली दौरा; इंडिया आघाडी घेणार मोठा निर्णय
uddhav thackeray
| Updated on: Aug 03, 2025 | 3:02 PM
Share

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसीय दिल्ली दौरा करणार आहेत. येत्या ६ ते ८ ऑगस्टदरम्यान उद्धव ठाकरे दिल्लीत असणार आहेत. या काळात ते इंडिया आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

७ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक

येत्या ७ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेमध्ये आगामी बैठकीच्या रणनीतीवर आणि संभाव्य विषयांवर विचारविनिमय झाल्याचे सांगितले जात आहे. इंडिया आघाडीच्या एकजुटीसाठी ही भेट आणि चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरही चर्चा

तसेच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा केवळ राजकीय बैठकांपुरती मर्यादित नसून ते दिल्लीमध्ये काही इतर महत्त्वाच्या व्यक्तींनाही भेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा विशेष लक्षवेधी ठरला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरे आपली भूमिका स्पष्टपणे मांडतील. तसेच महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरही चर्चा करतील, अशी शक्यता आहे. या बैठकीत भाजपविरोधी एकजूट अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

आघाडीची पुढील दिशा ठरणार

यामध्ये जागावाटप, प्रचाराची रणनीती आणि समान किमान कार्यक्रमावर चर्चा होईल, असे बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीत मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे विरोधकांची बाजू अधिक प्रभावीपणे मांडली जाण्याची आशा आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यातून काय निष्पन्न होते आणि आघाडीची पुढील दिशा कशी ठरते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.