AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: कारभार ऑनलाईन, एक्झिटही ऑनलाईनच, वाजपेयींनी ज्या संधीचं सोनं केलं तशीच संधी उद्धव ठाकरेंनी गमावली?

राज्यपालांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणेच बहुमत चाचणी तातडीने घेण्याबाबतचे निर्देश दिले. पण ही बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला उद्धव ठाकरे सामोरे गेले नाही.

Uddhav Thackeray: कारभार ऑनलाईन, एक्झिटही ऑनलाईनच, वाजपेयींनी ज्या संधीचं सोनं केलं तशीच संधी उद्धव ठाकरेंनी गमावली?
वाजपेयींनी ज्या संधीचं सोनं केलं तशीच संधी उद्धव ठाकरेंनी गमावली?Image Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Jun 30, 2022 | 1:34 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडी (MahaVikasAghadi) सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी बुधवारी राजीनामा दिला. त्यानंतर आता नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. हे सगळं घडलं, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे. या बंडानंतरही उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच हार मारली. त्यांनी राजीनामा दिला. बहुमत चाचणीत आकड्यांचा खेळच मला खेळायचा नाही, असं त्यांनी म्हटलंय. बहुमत चाचणी पुढे ढकलली जावी, यासाठी शिवसेना थेट सर्वोच्च न्यायालयातही गेली. पण तिथेही त्यांची हार झाली. सुप्रीम कोर्टात बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावली. राज्यपालांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणेच बहुमत चाचणी तातडीने घेण्याबाबतचे निर्देश दिले. पण ही बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला उद्धव ठाकरे सामोरे गेले नाही. त्यांनी नैतिकता जपली. बहुमताचा आकडा ठाकरेंकडे नव्हता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्रीपद (Chief Minister Resign) त्यागलं. पण यात एक महत्त्वाची संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली.

कारभार ऑनलाईन

उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे, जगात कोरोना महामारीचं संकट ओढावलं. या संकाटत उद्धव ठाकरे सरकारचा कारभार ऑनलाईन सुरु होता. अनेक गोष्टी ऑनलाईनच केल्या गेल्या. मग त्या कॅबिनेट बैठका असतील, राज्यातील जनतेशी करण्यात आलेलं संबोधन असेल, किंवा मग इतर शासकीय बैठका असतील.. ऑनलाईन पद्धतीने बहुतांश कामकाज चाललं होतं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची ओळख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली होती, त्याच पद्धतीनं लाईव्ह येत मुख्यमंत्री या पदावरुन उद्धव ठाकरे पायउतारही झाले.

बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा दिली असतील तर…

बहुमत चाचणीचा खेळ मला खेळायचा नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं खरं. पण त्यात त्यांनी एक संधी गमावली असल्याचाही एक तर्क लढवला जातोय. अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्या संधीचं सोनं केलं होतं, तीच संधी खरंतर उद्धव ठाकरे यांनाही चालून आली होती. ही संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली. बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे सामोरं गेले नाहीत. सभागृहात जाऊन उद्धव ठाकरेंनी जर बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा दिली असतील तर त्यांना बंडखोर आमदारांना थेट डोळ्यात डोळे खालून भिडता आलं असतं. त्यांना थेट सवाल उपस्थित करता आला असता.

सभागृहातल्या भाषणाची ऐतिहासिक नोंद होते

सभागृहात आज विश्वासमत सादर झालं असतं, तर त्यावेळेस उद्धव ठाकरेंना विरोधकांवर, बंडखोरांवर तुटून पडता आलं असतं. त्यांनी जी नैतिक प्रतिमा जपलीय ती आणखी उजळली असती. लोक त्यांच्यासोबत जे घडलं त्याबद्दल भावनिक तर आहेत. पण त्या भावना आणखी घट्ट करण्याची संधी उद्धव ठाकरेंना चालून आली होती. ऑनलाईन भाषणाची कुठेही नोंद होत नाही. पण सभागृहातल्या भाषणाची ऐतिहासिक नोंद होते. हे भाषण रेकॉर्डवर राहतं. त्याचं जतन होतं, आणि दाखले दिले जातात. ती संधी गेली.

अटलजींचं सभागृहातलं ऐतिहासीक भाषण

उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून शेवटचं भाषण!

उद्धव ठाकरेंना विरोधकांवर, बंडखोरांवर तुटून पडता आलं असतं

सभागृहात आज विश्वासमत सादर झालं असतं. त्यावेळेस उद्धव ठाकरेंना विरोधकांवर, बंडखोरांवर तुटून पडता आलं असतं. त्यांनी जी नैतिक प्रतिमा जपलीय ती आणखी उजळली असती, लोक त्यांच्यासोबत जे घडलं त्याबद्दल भावनिक आहेत. त्या भावना आणखी घट्ट करता आल्या असत्या.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.