AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : भुजबळ, राणे, राज ठाकरे आता एकनाथ शिंदे, वारंवार शिवसेनेसोबतच विश्वासघाताचं राजकारण का? उद्धव ठकरे म्हणतात…

या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना खोचक टोले लगावले आहेत. तसेच त्यांच्या बोलण्यात एक संतापही जाणवतो आहे. 

Uddhav Thackeray : भुजबळ, राणे, राज ठाकरे आता एकनाथ शिंदे, वारंवार शिवसेनेसोबतच विश्वासघाताचं राजकारण का? उद्धव ठकरे म्हणतात...
भुजबळ, राणे, राज ठाकरे आता एकनाथ शिंदे, वारंवार शिवसेनेसोबतच विश्वासघाताचं राजकारण का? उद्धव ठकरे म्हणतात...Image Credit source: saamana
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jul 26, 2022 | 7:18 AM
Share

मुंबई : गेल्या काही दशकातली शिवसेनेची वाटचाल पाहिल्यास शिवसेनेच्या पावलोपावली फुटीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वात आधी छगन भुजबळ, त्यानंतर नारायण राणे, त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray), गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे सहाजिकच वारंवार हे फुटीचं आणि विश्वासघाताचं राजकारण शिवसेनेसोबतच का?  असा प्रश्न सामानासाठी घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केला (Sanjay Raut Uddhav Thackeray Interview). इतर प्रश्नांची जशी उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने उत्तर दिली, तसेच त्यांनी याही प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना खोचक टोले लगावले आहेत. तसेच त्यांच्या बोलण्यात एक संतापही जाणवतो आहे.

शिवसेनेतच फूट का पडते?

या प्रश्नाला उत्तर देतान ठाकरे म्हणातात, शेवटी आम्ही पक्ष हा प्रोफेशनली चालवत नाही, असं मी म्हणेन. तुम्हीही गेले अनेक वर्ष शिवसेना अनुभवत आहात. आम्ही शिवसेना एक परिवार म्हणून बघत आलोय. बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं की एकदा आपलं म्हटलं की ते आपलंच, एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो. त्याला ताकद देण्यापासून पूर्ण जबाबदारी ही त्याच्यावरती टाकतो, असे उद्धव ठाकरे यांनी फुटीचं कारणं सांगितलं आहे.

हिंदूत्वावरून टोलेबाजीत

तसेच त्यांनी हिंदूत्वावरूनही टोलेबाजी केली आहे. जे आत्ता आम्ही हिंदुत्व सोडला अशी बोंब उडवत आहेत, त्यांना आम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तेव्हा आम्ही हिंदूत्व सोडलं नव्हतं, तेव्हा भाजपने युती तोडली. तेव्हाही अनेकांना वाटलं होतं की शिवसेना आता संपेल, पण शिवसेना एकाकी लढली आणि 63 आमदार शिवसेनेचे निवडून आले. त्या काळात विरोधी पक्षाची जबाबदारी जी आपल्यावर आली तेव्हा विरोधी पक्षनेते पद हे कोणाला दिलं होतं? हे ही आठवा, असे ठाकरे म्हणाले.

बोलून सर्व काही झालं असतं

तर भाजपने आत्ता जे केलं ते तेव्हा बोलणी केल्याप्रमाणे केलं असतं, तर ते सन्मानाने झालं असतं. देशभरात पर्यटन करण्याची गरज लागली नसती. हजारो कोटी रुपये खर्च केले केले असे मी ऐकलं. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, त्याच्यानंतर काही अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला खर्च, खोक्यात काय दडलय? ते देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहित. पण हे फुकटात झालं असतं आणि सन्मानाने झाला असतं, असेही ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावलं आहे.

भाजपला आधीच मुख्यमंत्रिपद मिळालं असतं

तसेच हे घडवण्यामागे एकच उद्देश होता, त्यांना शिवसेना संपवायची आहे. जे शिवसेनेसोबत ठरवलं होतं, अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पद तेच तर तुम्ही आता केलं, ते तेव्हाच केलं असतं तर निदान पाच वर्षात भाजपला एकदा तरी अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...