AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : भुजबळ, राणे, राज ठाकरे आता एकनाथ शिंदे, वारंवार शिवसेनेसोबतच विश्वासघाताचं राजकारण का? उद्धव ठकरे म्हणतात…

या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना खोचक टोले लगावले आहेत. तसेच त्यांच्या बोलण्यात एक संतापही जाणवतो आहे. 

Uddhav Thackeray : भुजबळ, राणे, राज ठाकरे आता एकनाथ शिंदे, वारंवार शिवसेनेसोबतच विश्वासघाताचं राजकारण का? उद्धव ठकरे म्हणतात...
भुजबळ, राणे, राज ठाकरे आता एकनाथ शिंदे, वारंवार शिवसेनेसोबतच विश्वासघाताचं राजकारण का? उद्धव ठकरे म्हणतात...Image Credit source: saamana
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jul 26, 2022 | 7:18 AM
Share

मुंबई : गेल्या काही दशकातली शिवसेनेची वाटचाल पाहिल्यास शिवसेनेच्या पावलोपावली फुटीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वात आधी छगन भुजबळ, त्यानंतर नारायण राणे, त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray), गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे सहाजिकच वारंवार हे फुटीचं आणि विश्वासघाताचं राजकारण शिवसेनेसोबतच का?  असा प्रश्न सामानासाठी घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केला (Sanjay Raut Uddhav Thackeray Interview). इतर प्रश्नांची जशी उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने उत्तर दिली, तसेच त्यांनी याही प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना खोचक टोले लगावले आहेत. तसेच त्यांच्या बोलण्यात एक संतापही जाणवतो आहे.

शिवसेनेतच फूट का पडते?

या प्रश्नाला उत्तर देतान ठाकरे म्हणातात, शेवटी आम्ही पक्ष हा प्रोफेशनली चालवत नाही, असं मी म्हणेन. तुम्हीही गेले अनेक वर्ष शिवसेना अनुभवत आहात. आम्ही शिवसेना एक परिवार म्हणून बघत आलोय. बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं की एकदा आपलं म्हटलं की ते आपलंच, एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो. त्याला ताकद देण्यापासून पूर्ण जबाबदारी ही त्याच्यावरती टाकतो, असे उद्धव ठाकरे यांनी फुटीचं कारणं सांगितलं आहे.

हिंदूत्वावरून टोलेबाजीत

तसेच त्यांनी हिंदूत्वावरूनही टोलेबाजी केली आहे. जे आत्ता आम्ही हिंदुत्व सोडला अशी बोंब उडवत आहेत, त्यांना आम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तेव्हा आम्ही हिंदूत्व सोडलं नव्हतं, तेव्हा भाजपने युती तोडली. तेव्हाही अनेकांना वाटलं होतं की शिवसेना आता संपेल, पण शिवसेना एकाकी लढली आणि 63 आमदार शिवसेनेचे निवडून आले. त्या काळात विरोधी पक्षाची जबाबदारी जी आपल्यावर आली तेव्हा विरोधी पक्षनेते पद हे कोणाला दिलं होतं? हे ही आठवा, असे ठाकरे म्हणाले.

बोलून सर्व काही झालं असतं

तर भाजपने आत्ता जे केलं ते तेव्हा बोलणी केल्याप्रमाणे केलं असतं, तर ते सन्मानाने झालं असतं. देशभरात पर्यटन करण्याची गरज लागली नसती. हजारो कोटी रुपये खर्च केले केले असे मी ऐकलं. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, त्याच्यानंतर काही अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला खर्च, खोक्यात काय दडलय? ते देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहित. पण हे फुकटात झालं असतं आणि सन्मानाने झाला असतं, असेही ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावलं आहे.

भाजपला आधीच मुख्यमंत्रिपद मिळालं असतं

तसेच हे घडवण्यामागे एकच उद्देश होता, त्यांना शिवसेना संपवायची आहे. जे शिवसेनेसोबत ठरवलं होतं, अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पद तेच तर तुम्ही आता केलं, ते तेव्हाच केलं असतं तर निदान पाच वर्षात भाजपला एकदा तरी अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...