AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete Passed Away : अहोरात्र मराठा समाजाचा विचार केला, विनायक मेटेंच्या निधानानं पोकळी निर्माण झाली-संभाजीराजे छत्रपती

Vinayak Mete Passed Away : मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी विधानभवनात बाजू मांडली. समाजावरील अन्याय सरकारनं दूर करावा, याने मेटेंच्या लढ्याला यश मिळेल, संभाजीराजे छत्रपती यांची भावना.

Vinayak Mete Passed Away : अहोरात्र मराठा समाजाचा विचार केला, विनायक मेटेंच्या निधानानं पोकळी निर्माण झाली-संभाजीराजे छत्रपती
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधनImage Credit source: social
| Updated on: Aug 14, 2022 | 9:12 AM
Share

मुंबई : आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आणि मराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी लढणारा माणूस महाराष्ट्रानं गमावला. ही राज्यासाठी मोठी पोकळी असल्याची प्रतिक्रिया दिग्गजांनी विनायक मेटेंच्या निधनावर (Vinayak Mete Passed Away) व्यक्त केली आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही घटना खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ घडली. मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती त्यासाठी ते मुंबईच्या दिशेनं येत असल्याची होते. दरम्यान, अपघात ते गंभीररित्या जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. विनायक मेटेंच्या निधनावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chatrapati) यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. ते काय म्हणालेत वाचा..

संभाजीराजे काय म्हणालेत?

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणालेत. ‘एक मोठा शॉक आहे. मराठा समाजासाठी परखडपणे आपली बाजू ते मांडत आले. मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी विधानभवनात आपली बाजू मांडली. मराठा समाजावरील अन्याय सरकारनं दूर करावा, याने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळेल. आजची बातमी ऐकूण मोठा शॉक बसला. वेळोवेळी त्यांनी मला अनेकदा फोन केले होते. कशा पद्धतीनं आपण एकत्र येऊ शकतो, यावर देखील अनेकदा संवाद साधला. छत्रपती घराण्याविषयी त्यांना नेहमी आदर होता, अशी भावना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर राज्यातील दिग्गज नेत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही विनायक मेटेंच्या निधनावर दुख व्यक्त केलंय. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल झाले आहेत. आज मराठा समन्वय समितीची बैठक असल्यानं पहाटेच विनायक मेटे हे मुंबईकडे येत असताना अचानकच एका ट्रकचा आणि मेटेंच्या गाडीचा अपघात झाला. यानं मराठा समाजाचा मोठा नेता गमावल्याची भावना अनेक दिग्गज नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.