नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, सगळं सत्य समोर येईल; कुणी टीकास्त्र डागलं? वाचा…

| Updated on: Jan 02, 2023 | 3:16 PM

ठाकरेगटाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा, असं ते म्हणालेत.

नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, सगळं सत्य समोर येईल; कुणी टीकास्त्र डागलं? वाचा...
नारायण राणे
Follow us on

सिंधुदुर्ग : सत्य समोर आणायचं असेल. रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, बाळा या सगळ्यांच्या हत्यांच्या खोलाशी जायचं असेल तर नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा. नितेश राणेंना सोडा, नारायण राणेंची (Narayan Rane) नार्कोटेस्ट केली तर अंकुश राणेला कुठे मारलं,कुठे जाळलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतील, असं ठाकरेगटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले आहेत.

ठाकरेगटाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा, असं ते म्हणालेत.

सर्वसामान्य लोकांना नोटबंदीचे परिणाम आजही भोगावे लागतात.नोटबंदीमुळे लोकांना त्रास झाला.आपल्याच हक्काच्या पैशांसाठी रांगेत उभं राहावं लागलं. त्यामुळे या निर्णयाविरोधात लोकभावना आहेत, असंही विनायक राऊत म्हणालेत.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य वादात अडकलं आहे. त्यावरही विनायक राऊत बोललेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर आहेत आणि स्वराज्यरक्षकही आहेत, असं ते म्हणालेत.

संजय राऊत यांचं भाषण म्हणजे निव्वळ बडबड, अशी टीका भागवत कराड यांनी केली आहे. त्यावरही विनायक राऊत बोललेत.संजय राऊत यांच्या एक एक वाक्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघतं.मीडियाच्या सकाळच्या बातम्या या संजय राऊत यांच्या अग्रलेखाने सुरू होतात,हे काय कमी आहे का?, असा सवालही त्यांनी केलाय.

नौटंकी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.ही असंच गल्लीबोळात बरळत राहतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वैभव नाईक यांनीही नितेश राणेंवर टीका केली आहे.नितेश राणेंनी या आधी ही अनेकदा आरोप केलेत.पूर्वी नथुराम गोडसेच्या विरोधात बोलायचे आता बाजूने बोलता आहेत.नितेश राणे मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या भूमिका बदलत आहेत.पण नितेश राणे कितीही अजित पवारांवर बोलले,आदित्य ठाकरेंवर बोलले तरी भाजप नितेश राणेंना कधी ही मंत्री करणार नाहीत, असं वैभव नाईक म्हणालेत.

शिंदेगट आणि भाजपचा आदित्य ठाकरेंनी घाम काढला आहे.ज्या पद्धतीने सर्वजण आदित्य ठाकरेंना टार्गेट करता आहेत. त्यातच आदित्य यांचा विजय आहे.महाराष्ट्रातील जनता,तरुण,सर्व शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या पाठीशी आहेत.आरोप करण्यापेक्षा चौकशी करा. सत्य समोर येईल, असं वैभव नाईक म्हणालेत.