AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काय झाडी, काय डोंगर’ नंतर शहाजीबापूंच्या फिटनेसची चर्चा, 8 दिवसात 9 किलो वजन कसं कमी केलं?

वाढलेलं वजन घटवणं अनेकांसमोरील आव्हान आहे.त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसात 9 किलो वजन घटवलं, नेमकं कसं? वाचा...

'काय झाडी, काय डोंगर' नंतर शहाजीबापूंच्या फिटनेसची चर्चा, 8 दिवसात 9 किलो वजन कसं कमी केलं?
| Edited By: | Updated on: Jan 02, 2023 | 2:45 PM
Share

बंगळुरू : आपण सगळेच आपल्या फिटनेसकडे (Fitness )विशेष लक्ष देत असतो. वाढतं वजन ही दिवसेंदिवस वाढत चाललेली समस्या आहे. सध्याच्या बिझी शेड्यूलमुळे आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं मोठा टास्क आहे. त्यातही वजन वाढलं असेल तर ते कमी करण्यासाठी नानाविध उपाय करूनही फरक जाणवत नाही. पण शिंदेगटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil Lost Weight) यांनी हे आव्हान लिलया पेललं आहे.

शहाजीबापूंनी अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केलं आहे. मागील दहा दिवसांपासून शहाजीबापू पाटील बंगळुरुमध्ये मुक्कामी होते. तिथे त्यांनी उपचार घेतले. अन् नऊ किलो वजन कमी केलं आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये त्यांनी उपचार घेतले. तिथं त्यांच्यावर पंचकर्म करण्यात आलं. यातून त्यांचं 9 किलो वजन कमी केलं आहे.

या उपचारानंतर शहाजीबापू आज सांगोल्यात परतणार आहेत. त्यामुळे शहाजीबापू आता नव्या रूपात पाहायला मिळतील.

अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांच्या या बदलाचं अनेकांनी कौतुक केलंय.

शहाजीबापू म्हणजे भारदस्त व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. पण आता त्यांनी स्वत:मध्ये घडवून आणलेला बदल आश्चर्यकारक आहे.

शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. ‘काय झाडी, काय डोंगर’या डायलॉगने तर शहाजीबापूंना विशेष ओळख दिली. आता शहाजीबापू वजन घटल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी स्वत:मध्ये केलेला हा बदल अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे.

सगळेच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. वजन घटवणं हे अनेकांसमोरचं चॅलेंज आहे. त्यांच्यांसाठी शहाजीबापू एक उदाहरण म्हणून समोर आहेत.

Follow Us
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....