AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारीस पठाण म्हणतात, आज छ. शिवाजी महाराज असते, तर म्हणाले असते….

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर म्हणाले असते, तुम्ही माझ्या पुतळ्यावर एवढा खर्च का करत आहात? त्याऐवजी त्याच पैशातून शाळा, रुग्णालये बांधा”, असे एमआयएमचे आमदार वारीस पठाण म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमातील ‘महाराष्ट्र MOST’ या सत्रात बोलत होते. या सत्रात वारीस पठाण यांच्यासह जलसंधारण मंत्री राम शिंदे, भारिप बहुजन […]

वारीस पठाण म्हणतात, आज छ. शिवाजी महाराज असते, तर म्हणाले असते....
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM
Share

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर म्हणाले असते, तुम्ही माझ्या पुतळ्यावर एवढा खर्च का करत आहात? त्याऐवजी त्याच पैशातून शाळा, रुग्णालये बांधा”, असे एमआयएमचे आमदार वारीस पठाण म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमातील ‘महाराष्ट्र MOST’ या सत्रात बोलत होते. या सत्रात वारीस पठाण यांच्यासह जलसंधारण मंत्री राम शिंदे, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही सहभागी झाले होते. कोरेगाव भीमा प्रकरण, संभाजी भिडे, आरक्षण इत्यादी मुद्द्यांवर या सत्रात मान्यवरांनी चर्चा केली.

कोरेगाव-भीम प्रकरणाबाबत सहभागी मान्यवर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर – कोरेगाव भीमा प्रकरणात जे काही पुरावे सापडले, ते फेक आहेत. पोलिसांनी त्यांचे काम नीट केले नाही.

राम शिंदे – कोरेगाव भीमा प्रकरणात सरकारने योग्य काम केले. आम्ही संभाजी भिडेंना पाठीशी घालत नाही. गृहखात्याच मला काही माहित नाही. पण हा विषय हा गृहखात्याच्या संदर्भात आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल 

भंग झालेल्या अपेक्षांचे पडसाद म्हणजे पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. या टीकेला उत्तर देताना राम शिंदे म्हणाले, “तीन राज्यांच्या निवडणुकीवरुन देशाच चित्र पालटणार नाही” या मुद्द्याचा धागा पकडत आमदार वारीस पठाण म्हणाले, “सबका साथ सबका विकास असे काहीच झाले नाही. 70 वर्षे झाली देशाला स्वतंत्र होऊन, पण काँग्रेस म्हणा किंवा भाजप कोणीही दलितांसाठी आणि मुसलमानांसाठी काही केले नाही.”

मराठा आरक्षण दिले आहे आणि ते कोर्टात आतापर्यंत टिकलं आहे. धनगर आणि मुसलमांच्या आरक्षणाचा पण प्रश्न लवकर सुटेल, असे आश्वासन यावेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.