Maharashtra Assembly Session : मध्यावधीची तयारी ठेवावी लागेल, पवार, राऊतांपाठोपाठ थोरातांचेही सुतोवाच

Maharashtra Assembly Session : विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेच जाणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Maharashtra Assembly Session : मध्यावधीची तयारी ठेवावी लागेल, पवार, राऊतांपाठोपाठ थोरातांचेही सुतोवाच
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 10:19 AM

विवेक गवानसे, मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली आहे. पवारांनी तर डिसेंबरमध्येच गुजरातसोबत महाराष्ट्राची निवडणूक होईल असे संकेत दिले आहेत. तर राऊतांनी शिंदे सरकार ही भाजपची तात्पुरती व्यवस्था असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? अशी चर्चा रंगलेली असतानाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनीही मोठं विधान केलं आहे. एकंदर ज्या पद्धतीने सरकार बनले त्याची स्थिती पाहता हे चालणार आहे का हे तर वादाचे आहे. या सरकारवर शंका येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवावी लागेल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. थोरात यांच्या या विधानामुळे काँग्रेसही मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.

काल विधानसभा अध्यक्षपदाची निवड झाली. यातून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. कायद्याची लढाई सुरू आहे. ती सुरू राहणार. त्यात योग्य तो निर्णय होईल. विश्वासदर्शक ठराव करून काम करायचे आहे. त्यावेळी बराच ऊहापोह होणार आहे. काही घडामोडी असल्यास प्रभारी उपस्थित राहण्याची पद्धत आहे त्यामुळे त्यात काही वेगळं असं नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

नामांतर योग्यच

औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे खुलासा मागितल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हायकमांडने विचारले तर सांगेल. माझा खुलासा करेल. जो निर्णय केला तो योग्यच केला. महाराष्ट्रच्या जनतेशी अनुरूप केला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आघाडीचा विरोधी पक्षनेता असावा

विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेच जाणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत महाविकास आघाडी एकत्र काम करेल. जो विरोधी पक्षनेता निवडला जाणार तो महाविकास आघाडी म्हणून निवडला जाईल. आज शरद पवार यांच्याशी फोनवर बोललो. महाविकास आघाडीचा विरोधी पक्षनेता, विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हे महाविकास आघाडी म्हणून निवडले पाहिजे असे मी त्याना सांगितले, असं थोरात म्हणाले.

रखडलेल्या गोष्टी दोन दिवसात कश्या?

यावेळी त्यांनी दैनिक सामनातील अग्रलेखावर प्रतिक्रिया व्यक्त केली. या कालखंडातील घडामोडीमुळे आम्ही काळजीत आहोत. 12 आमदार निवडून देण्याची राज्यपालांची भूमिका, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या गोष्टी वर्षानुवर्ष होत नव्हत्या त्या दोन दिवसात होत आहेत. अनेक गोष्टीत तर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तरीही निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे काळजी वाटत आहे. विशेषत: लोकशाहीची काळजी वाटत आहे. देशाची लोकशाही कशी पुढे जाणार आहे? राज्यघटनेने की वेगळ्या पद्धतीने जाणार आहे? सर्व सामान्य माणसाच्या मतदानाच्या हक्काच्या बाबतीत ही चिंता वाटत आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.