राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली.

राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Feb 15, 2020 | 8:36 PM

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली (Anil Deshmukh annouce Police recruitment). मागील सरकारने गेल्या 5 वर्षात पोलीस भरती केली नाही. मात्र, आम्ही पोलिसांच्या 8 हजार जागा भरणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. यासोबत 7 हजार सिक्युरिटी गार्डची भरती करणार असल्याचीही घोषणा गृहमंत्री देशमुख यांनी केली.

अनिल देशमुख म्हणाले, “मागील सरकारने गेल्या 5 वर्षात पोलीस भरती केली नाही. मात्र, आम्ही पोलिसांच्या 8 हजार जागा आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार आहोत. तसेच बलात्कार गुन्ह्यांबाबत आंध्र प्रदेश सरकारनं केलेल्या कायद्याचाही आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यासाठी 20 फेब्रुवारीला मी स्वतः आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहे. हिंगणघाटसारख्या घटना रोखता याव्यात यासाठी आंध्रप्रदेशमधील कायदा महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.”

राज्य सरकार कोरेगांव भीमा प्रकरणाचा तपास करत होतं. जर हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) द्यायचा होता, तर केंद्राने राज्य शासनाला विश्वासात घ्यायला पाहिजे होते. मात्र, तसं झालं नाही. एनआयएचा तपास सुरु असताना समांतरपणे विशेष तपास पथकाची (SIT) स्थापन करता येते का याचा कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. जर कायदेशीर तरतूद असेल तर भीमा कोरेगावप्रकरणी एसआयटीची स्थापन करू, असंही अनिल देशमुख यांनी नमूद केलं.

विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आगामी काळात पुण्यात दीड ते दोन लाख सीसीटीव्ही बसवणार असल्याचीही घोषणा केली. देशमुख यांनी यावेळी फोन टॅपिंगवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “फोन टॅपिंग प्रकरणी आम्ही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल आला की याबाबत माहिती दिली जाईल. जळगावच्या भाजप नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे त्यांच्या पण नेत्याच्या फोन टॅपिंगसंदर्भात चौकशी करण्याचा आग्रह केला. आहे. त्याचाही विचार करु.”

NRC आणि CAA मुळे महाराष्ट्रात कुठल्याही नागरिकाचे नागरिकत्व जाऊ देणार नसल्याचंही देशमुख यांनी नमूद केलं. देशमुख यांनी शरद पवार यांचं पत्र मिळालं असून त्याबाबत अधिकाऱ्याना सूचना केल्याची माहिती दिली.

“शरद पवारांनी दोन महिने आधीच गृहमंत्रिपद देणार असल्याचं सांगितलं होतं”

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यातील आपल्या प्रकट मुलाखतीत त्यांच्या गृहमंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “गृहखाते मिळणार याबाबत शरद पवार यांनी मला दोन महिने आधी नागपूरचं अधिवेशन सुरु असतानाच सांगितलं होतं.”

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh annouce Police recruitment

Non Stop LIVE Update
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.