AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्म तारखेवरून ठरवता येते करियरची दिशा, तुमच्या जन्म तारखेनुसार हे करियर ठरेल लाभदायक

वास्तविक, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख कुंडलीतील ग्रहांची स्थिती दर्शवते आणि यावरून त्याच्या कार्यक्षमतेसाठी आणि करिअरसाठी अधिक चांगला पर्याय सुचविता येतो.

जन्म तारखेवरून ठरवता येते करियरची दिशा, तुमच्या जन्म तारखेनुसार हे करियर ठरेल लाभदायक
अंकशात्रImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 01, 2023 | 11:20 AM
Share

मुंबई : तुम्हाला माहिती आहे का की, एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून (Numerology) त्याच्या करिअर आणि नोकरीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात. वास्तविक, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख कुंडलीतील ग्रहांची स्थिती दर्शवते आणि यावरून त्याच्या कार्यक्षमतेसाठी आणि करिअरसाठी अधिक चांगला पर्याय सुचविता येतो. अनेकदा तुम्ही ज्योतिषींना हातावरील रेषा पाहून भविष्य सांगताना पाहिले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरूनही त्याच्या करिअर आणि नोकरीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात. वास्तविक, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख पत्रिकेतील ग्रहांची स्थिती दर्शवते आणि यावरून त्याच्या कार्यक्षमतेसाठी आणि करिअरसाठी चांगले पर्याय दिसू शकतात.

जन्म तारखेनुसार या क्षेत्रात मिळवा यश

  1. जर जन्मतारीख 01, 10, 19 किंवा 28 असेल तर व्यक्तीचा संबंध सूर्य आणि मंगळाशी असतो. प्रशासन, वैद्यक, तंत्रज्ञान हे क्षेत्र त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. लाकूड आणि औषधाचा व्यवसायही त्यांना अनुकूल आहे. नोकरीत समस्या असल्यास त्यांनी तांबे धारण करावे. रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे.
  2. जर जन्मतारीख 02, 11, 20 किंवा 29 असेल तर असे लोक चंद्र आणि शुक्र या दोन्हीशी संबंधित असतात. अशा लोकांसाठी कला, अभिनय, संगीत, सौंदर्य आणि पाणी हे क्षेत्र उत्तम आहे. त्यांना पाणी, हॉस्पिटल, रेस्टॉरंट आणि सौंदर्याचा व्यवसायही आवडतो. नोकरीत समस्या असल्यास त्यांनी चांदीची अंगठी घालावी. शिवजींची खूप पूजा करावी.
  3. जेव्हा जन्मतारीख 03, 12, 21 किंवा 30 असेल तेव्हा व्यक्तीचा संबंध बुध आणि गुरूशी असतो. त्यांच्यासाठी शिक्षण, सल्लागार, वकिली आणि बौद्धिक क्षेत्र सर्वोत्तम मानले जाते. त्यांना स्टेशनरी, शिक्षण आणि धार्मिक कार्यातही भरपूर लाभ मिळतो. नोकरीत अडचण असल्यास त्यांनी सोन्याची अंगठी घालावी. यासोबत विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करावा.
  4. जेव्हा जन्मतारीख 04, 13, 22 किंवा 31 असेल तेव्हा व्यक्तीचा संबंध राहू आणि चंद्राशी असतो. तंत्रज्ञान, वैद्यक, ज्योतिष, तंत्र-मंत्र इत्यादी क्षेत्रे त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहेत. त्याला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्सल्टन्सीची फील्ड देखील आवडते. नोकरीत अडचण असल्यास त्यांनी स्टीलची अंगठी घालावी. त्यांनी प्रत्येक स्थितीत नित्य भगवान शिवाची पूजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.