AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Mahadasha: अत्यंत शुभ असते गुरूची महादशा, 16 वर्ष मिळतो फक्त पैसाच पैसा

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु शुभ स्थितीत असतो, ते खूप सुंदर आणि आकर्षक असतात. एवढेच नाही तर हे लोकं उच्च शिक्षण घेतात.

Guru Mahadasha: अत्यंत शुभ असते गुरूची महादशा, 16 वर्ष मिळतो फक्त पैसाच पैसा
गुरू महादशाImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 02, 2023 | 8:27 PM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), ग्रहांच्या महादशा आणि अंतरदशा यांचा प्रभाव सर्व राशींच्या जातकांवर स्पष्टपणे दिसून येतो. ही महादशा शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते. ही महादशा काही राशींसाठी शुभ आणि फलदायी ठरते, तर काहींसाठी कुंडलीत गोंधळ निर्माण करते. त्याचप्रमाणे आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या कुंडलीत गुरु शुभ स्थितीत आहे. हे लोक खूप भाग्यवान असतात.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु शुभ स्थितीत असतो, ते खूप सुंदर आणि आकर्षक असतात. एवढेच नाही तर हे लोकं उच्च शिक्षण घेतात. ते बुद्धिमान आणि स्वभावाने अतिशय शांत आहेत. कोणत्याही जातीच्या कुंडलीत गुरुची महादशा 16 वर्षे टिकते असे ज्योतिषी सांगतात. अशा स्थितीत ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु शुभ स्थितीत असतो, ते धनवान होतात.

गुरु महादशेचा काय परिणाम होतो?

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत गुरु शुभ असतो तेव्हा संबंधीत राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होतो. गुरु या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासू देत नाहीत. हे लोकं शिक्षणाच्या बाबतीत खूप पुढे जातात. हे लोकं अतिशय ज्ञानी आणि उदार मनाचे असतात. त्यांना मुलांचे सुख मिळते. बृहस्पतिची महादशा चालू असताना या लोकांना खूप प्रगती, मान, संपत्ती मिळते. तसेच वैवाहिक जीवनात आनंद मिळतो.

दुसरीकडे, कुंडलीत गुरूची अशुभ स्थिती व्यक्तीच्या करिअरमध्ये अनेक अडचणी निर्माण करते. या लोकांचे मन पूजेत अजिबात गुंतलेले नसते. एवढेच नाही तर हे लोकं पोटाशी संबंधित आजारांनी त्रस्त असतात किंवा होण्याचा धोका असतो. ज्योतिष शास्त्रानुसार बृहस्पति कमजोर असल्यास व्यक्ती वैवाहिक सुखापासून वंचित राहते. किंवा लग्नात अडथळे येतात. अशा लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अशा प्रकारे गुरू ग्रहाला बनवा बलवान

– जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु ग्रह कमजोर स्थितीत असेल तर त्याला मजबूत करण्यासाठी गुरुवारी व्रत करावे. त्या दिवशी पिवळी मिठाई किंवा बेसन आणि हळदीपासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करणे शुभ मानले जाते.

– जर एखाद्याच्या कुंडलीत बृहस्पति अशुभ असेल तर त्या व्यक्तीने भगवान बृहस्पतिची पूजा करावी. यासोबतच भगवान विष्णूची पूजा केल्याने बृहस्पति बलवान होतो.

– ज्योतिषशास्त्रानुसार आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून स्नान केल्याने गुरूचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि ग्रह बलवान होतो.

– या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करून झाडाला हळद, गूळ आणि हरभरा डाळ अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात, असे मानले जाते.

या दिवशी हरभरा डाळ, केळी आणि पिवळी मिठाई गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान केल्याने धन, वैवाहिक सुख, यश प्राप्त होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.