AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro 2023 : गुरु राहुची युती सहा महिने देणार त्रास, 40 दिवसानंतर ‘या’ राशी येणार अडचणीत

ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहांच्या युती खुपच अशुभ ठरतात. त्यापैकी एक म्हणजे गुरु आणि राहुची युती. या युतीमुळे गुरु चांडाळ योग तयार होतो आणि जातकाला त्रास होतो.

Astro 2023 : गुरु राहुची युती सहा महिने देणार त्रास, 40 दिवसानंतर 'या' राशी येणार अडचणीत
गुरु चांडाळ योगामुळे तीन राशींच संकट वाढणार, खर्चावर नियंत्रण ठेवा नाही तर...
| Updated on: Mar 11, 2023 | 8:11 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहाचं स्थान आणि युतीचा अभ्यास केला जातो. ग्रहांची पाप आणि शुभ ग्रह अशी वर्गवारी करण्यात आली आहे. पाप ग्रह आणि शुभ ग्रहांच्या युतीमुळे बऱ्याच घडामोडी घडतात. गोचर कालावधीनुसार गुरु ग्रह 23 एप्रिल 2023 रोजी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीच चंद्र आणि राहुची युती असल्याने ग्रहण योग असणार आहे. त्यात गुरु ग्रह राहुच्या संपर्कात येणार असल्याने गुरु चांडाळ योग तयार होणार आहे. म्हणजेच मेष राशीत गुरु चांडाळ आणि ग्रहण योग जुळून येणार आहे.

गुरु आणि चंद्राची युती होत असल्याने गजकेसरी योग असेल.मात्र हा अवघ्या काही तासांसाठी असेल. तर गुरु चांडाळ योगाची स्थिती 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे योगाचा मानव तसेच पृथ्वीतलावर विपरीत परिणाम दिसून येईल. त्यामुळे हा योग तयार होताच 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. गुरु चांडाळ योग हा सर्वात त्रासदायक योग म्हणून संबोधला जातो.

देवगुरु बृहस्पती बुद्धी, ज्ञान, धर्म इत्यादींचा स्वामी आहे. दुसरीकडे राहुमुळे व्यक्ती अनैतिक कृत्ये, अवैध कृत्ये, जुगार, नशा, सट्टेबाजीकडे खेचली जाते. जर कुंडलीत गुरु चांडाळ योग तयार झाला असेल तर राहू गुरुचा प्रभाव नष्ट करून व्यक्तीला पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणतो.

या राशींवर होईल विपरीत परिणाम

मेष : या राशीच्या लग्न भावात म्हणजेच प्रथम स्थानात 23 एप्रिल 2023 रोजी गुरु चांडाळ योग तयार होणार आहे.त्यामुळे सहा महिन्यांचा कालावधी अडचणीचा असणार आहे. या काळात अचानकपणे दुखाचा डोंगर कोसळले. आर्थिक दृष्ट्या तुमची बाजू खालावेल. समाजात काही कारणास्तव अपमान सहन करावा लागेल. आरोग्यविषयक तक्रारीचा सामना करावा लागेल.

मिथुन : गुरु चांडाळ योगामुळे या राशीच्या जातकांना वाईट बातम्यांचा भडीमार सुरु होईल. एक संकट गेलं की दुसरं संकट उभं राहील. अचानक येणाऱ्या संकटांमुळे मानसिक स्वास्थ्य ढासळेल. कामाच्या ठिकाणीही ताण दिसून येईल. त्यामुळे या काळात जितकं नामस्मरण करता येईल तितकं करा. त्याचबरोबर धार्मिक कार्य आणि पूजा यात वेळ व्यतित करा.

धनु : या राशीच्या पाचव्या स्थानात गुरु चांडाळ योग तयार होत आहे. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. गाडी चालवताना सतर्कता बाळगा. विनाकारण कसेही पैसे खर्च करू नका. तसेच अनावश्यक खर्च टाळा कारण अचानकपणे येणाऱ्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणीही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.