AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangal Dosh : पत्रिकेत असेल मंगळ दोष तर अशा प्रकारे करा निवारण

Mangal Dosh If there is Mangal Dosh in the kundali then remedy it in this way

Mangal Dosh : पत्रिकेत असेल मंगळ दोष तर अशा प्रकारे करा निवारण
मंगळ दोषImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 23, 2023 | 9:54 AM
Share

मुंबई :  अनेकदा असे दिसून येते की मांगलिक दोषामुळे (Mangal Dosh) जीवनात अनेक समस्या येतात. लग्न जुळण्यास विलंब होतो. वैवाहिक जिवनातही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. धन योग्य वेळी मिळत नाही. प्रत्येक कामात यश मिळते, पण त्यासाठी बराच विलंब होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास जन्मपत्रिकेमध्ये लग्न म्हणजे प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा अष्टम स्थान यापैकी कोणत्याही स्थानात जर मंगळ असेल तर त्याला सामान्यत: मंगळदोष मानले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तिला मांगलिक व्यक्ती असे म्हटले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तीला गृहस्थाश्रमात अनेक कष्टांचा सामना करावा लागतो. ज्योतिषाचा सल्ला घेऊन मंगल दोष दूर करण्यासाठी पूजा करावी.

उज्जैनच्या या मंदिरात करा पूजा

जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल तर उज्जैनच्या अंगारेश्वर महादेवात मंगलदोषाची पूजा करावी. उज्जैनच्या अंगारेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्याने मांगलिक दोष दूर होतो आणि शुभ फळ प्राप्त होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. मंगल दोष निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे वैवाहिक जीवनात मांगलिक दोष दिसून येत नाही.

वट सावित्री आणि मंगळा गौरीचे व्रत

मांगलिक दोष दूर करण्यासाठी वट सावित्री आणि मंगळा गौरीचे व्रत करावे. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. नकळत एखाद्या मांगलिक मुलीचा विवाह दोषरहित व्यक्तीशी झाला तर दोष दूर होण्यासाठी वट सावित्री किंवा मंगळा गौरी व्रताचे पालन करणे फलदायी ठरते.

गुपचूप पिंपळाच्या झाडाशी लग्न करा

मंगल दोष दूर करण्यासाठी विवाहापूर्वी गुपचूप पिंपळाच्या झाडाशी लग्न करावे. यामुळे पत्रिकेतील मंगळ दोष दुर होतो. वैवाहिक जिवनात कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.

मंगळवारी करा हनुमानाची पूजा

मंगळवारी व्रत ठेवून हनुमानाला शेंदूर लावून पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्याने मांगलिक दोषही दूर होतो. याशिवाय भगवान कार्तिकेयची पूजा केल्याने हा दोष दूर होतो. महामृत्युजय मंत्राचा जप केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि शुभ गोष्टी  घडतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.