AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangal Dosh : पत्रिकेत असेल मंगळ दोष तर अशा प्रकारे करा निवारण

Mangal Dosh If there is Mangal Dosh in the kundali then remedy it in this way

Mangal Dosh : पत्रिकेत असेल मंगळ दोष तर अशा प्रकारे करा निवारण
मंगळ दोषImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 23, 2023 | 9:54 AM
Share

मुंबई :  अनेकदा असे दिसून येते की मांगलिक दोषामुळे (Mangal Dosh) जीवनात अनेक समस्या येतात. लग्न जुळण्यास विलंब होतो. वैवाहिक जिवनातही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. धन योग्य वेळी मिळत नाही. प्रत्येक कामात यश मिळते, पण त्यासाठी बराच विलंब होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास जन्मपत्रिकेमध्ये लग्न म्हणजे प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा अष्टम स्थान यापैकी कोणत्याही स्थानात जर मंगळ असेल तर त्याला सामान्यत: मंगळदोष मानले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तिला मांगलिक व्यक्ती असे म्हटले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तीला गृहस्थाश्रमात अनेक कष्टांचा सामना करावा लागतो. ज्योतिषाचा सल्ला घेऊन मंगल दोष दूर करण्यासाठी पूजा करावी.

उज्जैनच्या या मंदिरात करा पूजा

जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल तर उज्जैनच्या अंगारेश्वर महादेवात मंगलदोषाची पूजा करावी. उज्जैनच्या अंगारेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्याने मांगलिक दोष दूर होतो आणि शुभ फळ प्राप्त होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. मंगल दोष निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे वैवाहिक जीवनात मांगलिक दोष दिसून येत नाही.

वट सावित्री आणि मंगळा गौरीचे व्रत

मांगलिक दोष दूर करण्यासाठी वट सावित्री आणि मंगळा गौरीचे व्रत करावे. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. नकळत एखाद्या मांगलिक मुलीचा विवाह दोषरहित व्यक्तीशी झाला तर दोष दूर होण्यासाठी वट सावित्री किंवा मंगळा गौरी व्रताचे पालन करणे फलदायी ठरते.

गुपचूप पिंपळाच्या झाडाशी लग्न करा

मंगल दोष दूर करण्यासाठी विवाहापूर्वी गुपचूप पिंपळाच्या झाडाशी लग्न करावे. यामुळे पत्रिकेतील मंगळ दोष दुर होतो. वैवाहिक जिवनात कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.

मंगळवारी करा हनुमानाची पूजा

मंगळवारी व्रत ठेवून हनुमानाला शेंदूर लावून पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्याने मांगलिक दोषही दूर होतो. याशिवाय भगवान कार्तिकेयची पूजा केल्याने हा दोष दूर होतो. महामृत्युजय मंत्राचा जप केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि शुभ गोष्टी  घडतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...