AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangal Dosh Upay : पत्रिकेत असेल मंगळ दोष तर येतात असे अनुभव, जाणून घ्या प्रभावी उपाय

पत्रिकेत मंगल दोष (Mangal Dosh Upay) असल्यास त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात असे म्हटले जाते. यामुळे व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबतो.

Mangal Dosh Upay : पत्रिकेत असेल मंगळ दोष तर येतात असे अनुभव, जाणून घ्या प्रभावी उपाय
मंगळ दोष उपाय Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 06, 2023 | 2:32 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ हा शनि, राहू आणि केतू प्रमाणेच क्रूर ग्रह मानला जातो. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा शासक ग्रह आहे. पत्रिकेत मंगल दोष (Mangal Dosh Upay) असल्यास त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात असे म्हटले जाते. यामुळे व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबतो. याशिवाय मालमत्तेशी संबंधित वादांनाही सामोरे जावे लागेल. पत्रिकेत मंगळ दोषाची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया.

पत्रिकेत मंगळ दोषाची लक्षणे

  • ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगल दोष असेल तर त्या व्यक्तीच्या लग्नास विलंब होतो, यासोबतच अनेक प्रकारच्या अडचणी येतात.
  • जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर त्याला जास्त राग येतो. त्यामुळे लोकं दुरावतात.
  •  जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर त्याला डोळ्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. याशिवाय उच्च रक्तदाब , लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजारही होऊ शकतात.

ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर अशा व्यक्तीला कादेशीर कारवाईला समोर जावे लागते.

जाणून घ्या मंगळ दोष कमी करण्याचे उपाय

  • ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेत मंगळाची स्थिती अशुभ असेल तर त्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाला जल अर्पण करावे. यासोबत पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे.
  • ज्योतिष शास्त्रानुसार जर पत्रिकेत मंगळाची स्थिती खराब असेल तर त्या व्यक्तीने प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी विधीवत हनुमानजीची पूजा करावी.
  • पत्रिकेत मंगळाची स्थिती अशुभ असेल तर त्या व्यक्तीने मसूर, गहू, लाल रंगाचे कपडे, गूळ इत्यादी दान करावे.
  •  जर पत्रिकेत मंगळ दोष असेल आणि विवाहात अडथळा येत असेल तर हनुमानजींची विधि-विधानानुसार पूजा करावी आणि त्यांना शेंदूर अर्पण करावा. त्यामुळे विवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...