AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni Amavasya 2024 : या तारखेला आहे मौनी अमावस्या, शास्त्रात सांगितले आहे महत्त्व

अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि मन कमजोर होत नाही, असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे आणि वाईट बोलणे टाळावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे.

Mouni Amavasya 2024 : या तारखेला आहे मौनी अमावस्या, शास्त्रात सांगितले आहे महत्त्व
मौनी अमावस्या Image Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Feb 09, 2024 | 7:32 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात अनेक तिथी आहेत आणि सर्वांचे स्वतःचे महत्त्व आहे. त्यातील एक म्हणजे अमावस्या. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी (Mouni Amavasya) अमावस्या म्हणतात. जैन धर्मात याला विशेष महत्त्व आहे. हिंदूंमध्ये ही दर्श अमावस्या म्हणून पाळली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी मनु ऋषींचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पंचांगानुसार, 2024 मध्ये मौनी अमावस्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8.02 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 फेब्रुवारीला पहाटे 4:28 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या पाळली जाणार आहे.

मौनी अमावस्येचे महत्व

मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने शुभ फळ मिळते. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी हजारो भाविक प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे संगम स्नान करण्यासाठी जमतात. ज्यांना कोणत्याही पवित्र नदीत स्नान करता येत नाही ते घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करतात. मौनी अमावस्येच्या दिवशी पूजेसोबतच स्नान केल्यानेही हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते. या दिवशी सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

मौनव्रत पाळावे का?

अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि मन कमजोर होत नाही, असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे आणि वाईट बोलणे टाळावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे.

दान करणे चांगले आहे का?

मौनी अमावस्येच्या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने देवता आणि पितरांचा आशीर्वाद सदैव राहतो. या दिवशी तीळ तांदूळ तिळाचे लाडू कपडे तीळाचे तेल पैसे दान केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.