AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यग्रहण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार आणि लक्ष्मी मातेचा मिळेल आशीर्वाद

यावर्षी श्रावण महिन्यात 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण दिसणार आहे. जरी याचा प्रभाव भारतात जाणवणार नसला तरी, ज्योतिषीय गणनेनुसार याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. चला तर मग या सुर्य ग्रहणाचा कोणत्या तीन राशींवर चांगला प्रभाव पडणार आहे ते जाणून घेऊयात.

सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार आणि लक्ष्मी मातेचा मिळेल आशीर्वाद
| Edited By: | Updated on: Jul 28, 2026 | 9:13 PM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी 12 ऑगस्ट रोजी वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आकाशात दिसेल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 17 मिनिटांनी सुरू होऊन 13 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजून 2‍5 मिनिटांपर्यंत चालेल. हे खग्रास सूर्यग्रहण आहे, पण चांगली बातमी ही आहे की सूर्यग्रहणाचा प्रभाव भारतात दिसणार नाहीये. हे ग्रहण युरोप, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, उत्तर रशिया आणि आर्क्टिक प्रदेशात स्पष्टपणे दिसेल. हे सुर्यग्रहण संपेपर्यंत या देशांमध्ये अंधार असेल. दरम्यान ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार चंद्राची स्वामी राशी असलेल्या कर्क राशीत होणाऱ्या या ग्रहणासाठी लोकांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. जरी हे ग्रहण भारतातून दिसणार नसले आणि त्याचा सुतक काळही नसेल, तरी पारंपरिक मान्यतेनुसार जरी हे ग्रहण दिसत नसले तरी या खगोलीय घटनेचा प्रभाव जवळपास सर्व राशींवर पडेल आणि त्याचे परिणाम सुमारे 15 दिवस टिकू शकतात.

ज्योतिषांच्या मते हे सूर्यग्रहण काही राशींसाठी धन आणि यशाचे दरवाजे उघडू शकते, तर इतरांना तीव्र मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीचा धोका आहे. तथापि या तीन राशींच्या लोकांच्या जीवनातील संकटाचे सर्व समस्या दूर होणार आहेत आणि भाग्याची चाहूल लागणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत या तीन राशी…

मिथुन रास

हे ग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी एक मोठे आश्चर्य घेऊन येऊ शकते. तुमच्या जीवनात आर्थिक प्रगतीच्या प्रचंड संधी आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होण्याचे प्रबळ संकेत आहेत. तथापि, पैसा आल्यावरही एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे: आपल्या बोलण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवा, नाहीतर ही संधी हातातून निसटू शकते.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा खूप सकारात्मक काळ आहे. बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित असलेले एखादे काम अचानक पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. शिवाय निधीचे नवीन स्रोतही सहज उपलब्ध होतील. परिणामी तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

मीन रास

या सुर्यग्रहणाच्या काळात मीन राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळू शकते. कामातील बढती किंवा व्यवसायातील नफ्या व्यतिरिक्त म्हाला अशी काही चांगली बातमी देखील मिळू शकते जी तुमचे भविष्य बदलेल.

या राशींना देखील फायदा होऊ शकतो

जरी या तीन राशींसाठी भाग्याचे दरवाजे अजूनही उघडे असले तरी, वृषभ, वृश्चिक आणि कुंभ राशींसाठी ग्रहणाचे एकूण परिणाम संमिश्र असतील. त्यांना करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतील आणि भाग्याच्या जोरावर ते आपल्या शत्रूंवर मात करू शकतील. तथापि त्यांना आपल्या आरोग्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या काळात अनावश्यक प्रवास टाळणे उचित ठरेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी