5

Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान

हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी त्या दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषींना दाखवून जुळवल्या जातात. जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्रे इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळवतात. याच्या आधारे त्या जोडीचे भविष्य वर्तवले जात असते. पण, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी राशी देखील जुळल्या पाहिजे

Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान
Zodiac__Signs
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 9:47 AM

मुंबई : हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी त्या दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषींना दाखवून जुळवल्या जातात. जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्रे इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळवतात. याच्या आधारे त्या जोडीचे भविष्य वर्तवले जात असते. पण, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी राशी देखील जुळल्या पाहिजे (These zodiac signs has opposite in nature should avoid to marry each other for happy life).

प्रत्येक राशी व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम करते. जर दोन विरुद्ध राशीच्या लोकांचे लग्न झाले तर दररोज त्यांच्या आयुष्यात काहीतरी ना काही चुकीचे घडत राहते. घरातील वातावरण अशांत होते. पण, कोणतीही परिस्थिती सुज्ञपणे हाताळली जाऊ शकते. येथे जाणून घ्या अशा राशींबद्दल, ज्यांचे आपापसात कधीही जुळत नाही, त्यांनी लग्न करण्यापूर्वी योग्य विचार करणे फार महत्वाचे आहे.

कर्क आणि सिंह –

ज्योतिषानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेल नाही. कर्क राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराशी जोडलेले असतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात. तर सिंह राशीचे व्यक्ती स्वतंत्र विचारांचे असतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर खरे उतरत नाही. यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होते.

कुंभ आणि मकर –

कुंभ आणि मकर दोघांनाही नात्याबद्दल चांगली समज आहे, परंतु त्यांच्या विपरीत स्वभावामुळे ते एकमेकांशी जुळत नाहीत. मकर राशीचे लोक खूप भावनिक असतात, तर कुंभ लोक प्रत्येक निर्णय व्यावहारिकपणे घेतात. हा फरक त्यांच्या दरम्यानच्या संघर्षाचे कारण बनतो आणि बर्‍याच वेळा हे प्रकरण संबंधाच्या शेवटी येते.

वृषभ आणि तुला –

या दोन्ही राशीचे लोक अतिशय बुद्धिमान आणि स्वच्छ हृदयाचे असतात. सुरुवातीच्या काळात त्यांच्यात खूप चांगले संबंध राहतात, परंतु हळूहळू ते एकमेकांना आपला मुद्दा पटवण्यासाठी आग्रह करु लागतात. यामुळे त्यांच्यात अहंकाराची समस्या उद्भवते आणि त्यांचे संबंध कमजोर होऊ लागतात.

कर्क आणि धनु –

कर्क आणि धनु राशीचे व्यक्ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाही. धनु राशीच्या लोकांना वेळेसोबत आणि वेळेनुसार प्रगती करणे चांगले माहित आहे, तर कर्क राशीच्या व्यक्तींवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडते. यामुळे, त्यांच्या जीवनात अनेकदा भांडणे आणि तणावाच्या परिस्थिती उद्भवतात.

मिथुन आणि कन्या –

कन्या आणि मिथुन राशीची स्थिती कुंभ आणि मकर यांच्यासारखीच आहे. कन्या राशीच्या व्यक्ती खूप व्यावहारिक असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्ती खूप भावनिक असतात. यामुळे, दोघांची मते एकमेकांशी जुळत नाहीत आणि त्यांच्यात मतभेद उद्भवतात. जेव्हा खूप त्रास होतो, तेव्हा कन्या वेगळे होणे आणि अगदी सहजपणे पुढे जाणे पसंत करतात. तर मिथुन राशीच्या लोकांना अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण जाते.

These zodiac signs has opposite in nature should avoid to marry each other for happy life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Libra Zodiac | ही आहेत ती कारणं ज्यामुळे तूळ राशीला सर्वश्रेष्ठ राशी मानली जाते

Leo Zodiac | सिंह राशीच्या व्यक्तीला या 5 गोष्टी कधीही बोलू नये, अन्यथा तुम्ही त्यांच्या क्रोधाला बळी पडाल

Non Stop LIVE Update
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?